राष्ट्राचा गौरव ‘छत्रपती शिवाजी महाराज’
लेखक : नी३ प्रमिला दिलीप अहिरराव
आज भारताच्या गौरवाची चर्चा देश-विदेशात झपाट्याने सुरू आहे. गेल्या काही वर्षांत, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या खऱ्या इतिहासाची पुनःस्थापना प्रभावीपणे होत आहे. जनमानसाने इतिहासातील सत्य घटनांना नव्याने उजाळा दिला असून, इतिहासात केवळ ३% गोष्टींचा उल्लेख झालेला आहे. उर्वरित ९७% गोष्टी अजूनही अंधारात आहेत.
या उपेक्षित इतिहासाच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय निश्चितच शिवनेरीच्या तटबंदीवर उमटलेल्या बाल शिवाजीच्या सिंहगर्जनेला जाते. ज्यांनी स्वराज्याचा संकल्प करत परकीय सत्तेला आव्हान दिले. त्यांच्या विचारांमधून केवळ तलवार नाही, तर शौर्य, नीतिमत्ता, न्याय आणि लोककल्याणकारी राज्यकारभार निर्माण झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ शौर्याच्या जोरावर नव्हे, तर सुशासनाच्या तत्त्वांवर आधारलेले स्वराज्य उभे केले. लोकांची गरज, सुरक्षितता, न्याय, शिक्षण, धर्मनिरपेक्षता आणि स्त्रियांचा सन्मान या मूल्यांवर आधारित शासन पद्धती त्यांनी प्रस्थापित केली.
शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले, दुर्ग, जलदुर्ग यांची उभारणी केली, जलसेनेची स्थापना केली. भविष्यातील धोके लक्षात घेऊन त्यांनी प्रत्येक किल्ल्याचे स्थान, संरचना आणि युद्धनिती अभ्यासपूर्ण पद्धतीने निश्चित केली. युद्धनितीचे स्पष्ट नियम तयार केले. व्यापाराला चालना देण्यासाठी सुरक्षित व्यापारी मार्ग उभारले.
त्यांचे शासन हे केवळ युद्धावर आधारित नव्हते, तर समाजकारण, अर्थव्यवस्था, विज्ञान, शेती, जलसंधारण, शिक्षण, संस्कृती, आणि लोककल्याण यांचा समावेश असणारे होते. त्यांनी स्वतःहून तंत्रज्ञान, नवोन्मेष व आधुनिक दृष्टी स्वीकारली.
त्यांच्या राजवटीत भारताच्या आर्थिक व सामाजिक पुनर्जागरणाची पायाभरणी झाली. जलव्यवस्था, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आंतरराष्ट्रीय व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
शिवाजी महाराजांनी केवळ शत्रूंना पराभूत केले नाही, तर जनतेला सन्मान आणि स्वाभिमान दिला. त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्यात धर्मनिरपेक्षता होती, न्याय होता, लोकसामर्थ्य होतं.
आजच्या काळात त्यांच्या आदर्शांवर आधारित शासनप्रणाली अभ्यासण्याची आणि आत्मसात करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य म्हणजे भारताच्या आधुनिक राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी दिशादर्शक तारा आहे.
"छत्रपती" हा केवळ एक किताब नाही, तर तो एक विचार आहे —
एक आदर्श, एक प्रेरणा, एक सत्तेच्या मर्यादा ओळखणारा लोकहितवादी राजा !
"माझं सौभाग्य आहे की मी ‘हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेचा विचार करू शकलो. या छत्रपतींच्या भूमीत जन्म घेतला.
राष्ट्रध्वजाच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असावं, अशी प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते."
जय भारत।
जय शिवाजी।
जय महाराष्ट्र।
✍️ लेखक : नी३ प्रमिला दिलीप अहिरराव
(संचालक – राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे)
❤18🔥2👌2
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
राष्ट्राचा गौरव ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लेखक : नी३ प्रमिला दिलीप अहिरराव आज भारताच्या गौरवाची चर्चा देश-विदेशात झपाट्याने सुरू आहे. गेल्या काही वर्षांत, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या खऱ्या इतिहासाची पुनःस्थापना प्रभावीपणे होत आहे. जनमानसाने इतिहासातील…
माझा लेख आवडला असेल तर तूफान (सर्वत्र) शेयर करा...❤️❤️❤️
❤14👍1
जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे.
माणसाला दुसऱ्याची वाट लावता-लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा,
माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकती वरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो . चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही....🙇♂️❤️
माणसाला दुसऱ्याची वाट लावता-लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा,
माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकती वरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो . चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही....🙇♂️❤️
❤53
मला आवडतं म्हणुन तुलाही आवडायला हवं..
ऐवजी..
तुला आवडतं म्हणुन मलाही आवडतं..
असं म्हणणारं कुणीतरी हवं..!
©️®️✍️ शैलजा ❤️ शब्दशैली
@Shabdshailee
ऐवजी..
तुला आवडतं म्हणुन मलाही आवडतं..
असं म्हणणारं कुणीतरी हवं..!
©️®️✍️ शैलजा ❤️ शब्दशैली
@Shabdshailee
❤48
"लवकर यशाची गुरुकिल्ली : योग्य पद्धत, नियोजन, मार्गदर्शन आणि PYQ विश्लेषण"
स्पर्धा परीक्षांच्या महासागरात काही जण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात आणि इतर अनेकजण वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही ध्येयाच्या अगदी जवळ जातात पण अंतिम यशापासून दूर राहतात. मग असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, "आपण का नाही लवकर यश मिळवू शकत?"
या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं, तर ते आहे – योग्य अभ्यास पद्धती, योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि PYQ चे अचूक विश्लेषण.
स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ १०-१२ तास अभ्यास करून चालत नाही, तर तो अभ्यास योग्य दिशेने हवा. कोणते विषय आधी घ्यायचे, कसे समजून घ्यायचे, किती वेळ दिला पाहिजे, याचं नीट मूल्यांकन करणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण एका विषयातच अडकतो आणि दुसरे विषय दुर्लक्षित होतात. ही अडचण टाळण्यासाठी समतोल अभ्यास ही यशाची पहिली पायरी आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा एक कॉमन गुण म्हणजे त्यांचं दैनंदिन नियोजन ठाम आणि अचूक असतं. दररोज कोणता विषय किती वेळ दिला, कोणते टॉपिक किती दिवसांत पूर्ण करायचे, रिव्हिजनसाठी किती वेळ ठेवायचा, हे सर्व ठरवलेलं असतं. एक छोटंसं टाइमटेबल देखील आपली उत्पादकता दुप्पट करू शकतं.
MPSC-UPSC ही वाट खडतर आहे. योग्य मार्गदर्श न मिळाल्या मुळे अनेक जण भरकटतात. त्यासाठी योग्य मार्गदर्शक हवा –सीनियर्स, किंवा विश्वसनीय अधिकारी मित्र यांची मदत घेतली पाहिजे. त्यांनी दिलेला अनुभव आपला वेळ आणि उर्जा वाचवतो. मार्गदर्शन हे यशाकडे नेणारी शॉर्टकट नसली तरी, योग्य दिशा दाखवणारी नक्कीच असते.
पूर्वीच्या प्रश्नपत्रिका (PYQ – Previous Year Questions) म्हणजे UPSC/MPSC आयोगाची "प्रवृत्ती" समजून घेण्याचं उत्तम साधन आहे. कोणते विषय वारंवार विचारले जातात? कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात? किती खोलात विचारलं जातं? हे सर्व समजल्याशिवाय अभ्यास करत राहणं म्हणजे डोळे झाकून धावणं.
🔑
आज जे विद्यार्थी पहिल्या-दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात, ते बुद्धिमान किंवा भाग्यवान नसतात, तर ते प्रत्येक टप्प्यावर योग्य निर्णय घेतलेले असतात.
त्यांचा अभ्यास हा सुशिक्षित असतो, नियोजन शिस्तबद्ध असतं, मार्गदर्शन अनुभवसंपन्न असतं आणि PYQ विश्लेषण हे युद्धातील शस्त्रासारखं असतं.
स्पर्धा परीक्षा म्हणजे धैर्य, चिकाटी, आणि स्मार्ट अभ्यास यांची परिक्षा आहे. "मी किती वेळा अपयशी झालो" हे महत्त्वाचं नाही, तर "मी दर वेळी कुठे चुका केल्या आणि त्या सुधारल्या का?" हे महत्त्वाचं आहे.
लवकर यश हवं असेल, तर "योग्य दिशा" निवडायलाच हवी. मेहनत तर सगळेच करतात, पण ती योग्य मार्गावरच असेल, तर यश तुमच्या दाराशी येण्यास वेळ लागत नाही.
"चुकीच्या पद्धतीने १० वेळा अपयशी होण्यापेक्षा, एकदाच योग्य पद्धतीने यशस्वी व्हा!"
✍️ सुशांत कुलकर्णी
(कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)
@sushant_kulkarni_official
Insta ID @Dr.Sushant_4848
स्पर्धा परीक्षांच्या महासागरात काही जण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात आणि इतर अनेकजण वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही ध्येयाच्या अगदी जवळ जातात पण अंतिम यशापासून दूर राहतात. मग असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, "आपण का नाही लवकर यश मिळवू शकत?"
या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं, तर ते आहे – योग्य अभ्यास पद्धती, योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि PYQ चे अचूक विश्लेषण.
स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ १०-१२ तास अभ्यास करून चालत नाही, तर तो अभ्यास योग्य दिशेने हवा. कोणते विषय आधी घ्यायचे, कसे समजून घ्यायचे, किती वेळ दिला पाहिजे, याचं नीट मूल्यांकन करणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण एका विषयातच अडकतो आणि दुसरे विषय दुर्लक्षित होतात. ही अडचण टाळण्यासाठी समतोल अभ्यास ही यशाची पहिली पायरी आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा एक कॉमन गुण म्हणजे त्यांचं दैनंदिन नियोजन ठाम आणि अचूक असतं. दररोज कोणता विषय किती वेळ दिला, कोणते टॉपिक किती दिवसांत पूर्ण करायचे, रिव्हिजनसाठी किती वेळ ठेवायचा, हे सर्व ठरवलेलं असतं. एक छोटंसं टाइमटेबल देखील आपली उत्पादकता दुप्पट करू शकतं.
MPSC-UPSC ही वाट खडतर आहे. योग्य मार्गदर्श न मिळाल्या मुळे अनेक जण भरकटतात. त्यासाठी योग्य मार्गदर्शक हवा –सीनियर्स, किंवा विश्वसनीय अधिकारी मित्र यांची मदत घेतली पाहिजे. त्यांनी दिलेला अनुभव आपला वेळ आणि उर्जा वाचवतो. मार्गदर्शन हे यशाकडे नेणारी शॉर्टकट नसली तरी, योग्य दिशा दाखवणारी नक्कीच असते.
पूर्वीच्या प्रश्नपत्रिका (PYQ – Previous Year Questions) म्हणजे UPSC/MPSC आयोगाची "प्रवृत्ती" समजून घेण्याचं उत्तम साधन आहे. कोणते विषय वारंवार विचारले जातात? कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात? किती खोलात विचारलं जातं? हे सर्व समजल्याशिवाय अभ्यास करत राहणं म्हणजे डोळे झाकून धावणं.
🔑
आज जे विद्यार्थी पहिल्या-दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात, ते बुद्धिमान किंवा भाग्यवान नसतात, तर ते प्रत्येक टप्प्यावर योग्य निर्णय घेतलेले असतात.
त्यांचा अभ्यास हा सुशिक्षित असतो, नियोजन शिस्तबद्ध असतं, मार्गदर्शन अनुभवसंपन्न असतं आणि PYQ विश्लेषण हे युद्धातील शस्त्रासारखं असतं.
स्पर्धा परीक्षा म्हणजे धैर्य, चिकाटी, आणि स्मार्ट अभ्यास यांची परिक्षा आहे. "मी किती वेळा अपयशी झालो" हे महत्त्वाचं नाही, तर "मी दर वेळी कुठे चुका केल्या आणि त्या सुधारल्या का?" हे महत्त्वाचं आहे.
लवकर यश हवं असेल, तर "योग्य दिशा" निवडायलाच हवी. मेहनत तर सगळेच करतात, पण ती योग्य मार्गावरच असेल, तर यश तुमच्या दाराशी येण्यास वेळ लागत नाही.
"चुकीच्या पद्धतीने १० वेळा अपयशी होण्यापेक्षा, एकदाच योग्य पद्धतीने यशस्वी व्हा!"
✍️ सुशांत कुलकर्णी
(कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)
@sushant_kulkarni_official
Insta ID @Dr.Sushant_4848
❤27