रील बघून बघून आतापर्यंत कोण कोण श्रीमंत झालंय?
कोण कोण किती देशात फिरून आलंय?
कोण कोण ट्रिक आणि टिप्स बघून कारागीर झालंय?
कोण कोण उत्तम शेफ तयार झाला ??
हे सगळं बघण्यात फक्त “बघणं” तेवढं होत असतं.. जोपर्यंत आपण काही करत नाही तोपर्यंत काही बदलणार नाहीये!🎯
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
❤18😍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Kal ko poochoge 'Pinky sirf paise walo ki kyun hai' 🤣
Kya ho gaya hai SSC walo ko 🗿
Kya ho gaya hai SSC walo ko 🗿
👍17🔥3❤1
*आयुष्याची प्रश्नपत्रिका*
*✍️*
*आपण प्रत्येक इयत्तेच्या प्रश्नपत्रिका सोडवून पाहिल्या,स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या इतर कित्येक प्रश्नमंजुषा पाहिल्या असतील.*
*यातील काही सोप्या असतील तर काही अवघड..काही आयुष्याला भाकरी ही देणाऱ्या ठरल्या असतील.*
*पण आता एक प्रश्नपत्रिका दररोज आपल्या समोर येते... ज्याने आपल्या दिवसाची सुरूवात होते आणि त्यानेच ग्लानी येते..ती म्हणजे आयुष्याची प्रश्नपत्रिका होय.*
*पण येथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते बरं का ?आणि उत्तरे पण वेगळी असतात... आणि हो यासाठी लागणारा वेळ ही वेगवेगळ्या प्रश्नाच्या काठीण्य पातळीवर ठरलेला असतो. कोणाला अगदी एक मिनिट तर कोणाला उभे आयुष्य गेले तरीही हे प्रश्न सुटत नाहीत...आणि सुटलेच तरी गणिताच्या उत्तराप्रमाणे अचूकपणा देतील असे नाही..*
*या प्रश्नांना वेळ नाही... काळ नाही... कधी कोणती प्रश्नपत्रिका समोर येईल सांगता येत नाही... पण हे प्रश्न सोडविल्याशिवाय इलाज नाही. सोडून ही चालत नाही... आणि येथे पर्याय ही नाही... कारण ते आपल्याशी निगडीत असतात.*
*कधी कधी हे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला पैसा, तर कधी माणसे, तर कधी वेळ हवा असतो. या पलीकडे प्रश्न पत्रिका आयुष्याची नसतीच...हे वेळेवर भेटले नाहीतर आपली स्थिती समुद्रात भरकटलेल्या जहाजासारखी होऊन जाते.... जी सरळ काठावर येत नाही आणि तिला योग्य दिशा ही सापडत नाही... मग मात्र आयुष्याचे होकायंत्र बिघडते...*
*एकवेळ शाळेचा पेपर,स्पर्धापरीक्षेचा पेपर सोडवताना एकमेकांना विचारून पाहून सोडवू शकतो. पास होऊ* *शकतो.पण आयुष्याचा पेपर ज्याचा त्यानेच सोडवावा लागतो...येथे तुम्ही पास होत नाही तर समाजाच्या नजरेत यशस्वी आणि अयशस्वी ठरत असता.*
*आयुष्याचा पेपर तुमच्या* *स्वकर्तृत्वावर, तुमच्या चरित्र्यावर, तुमच्या कष्टावर, तुमच्या आचरणावर अवलंबून असतो...आणि या पेपरला अमर्यादित वेळ असतो..काही जणांचे पेपर असे असतात की ते जग सोडून जातील पण पेपर काय सुटत नाही...*
*आणि शोधत असलेल्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहतात..पुढे प्रश्न सुटेल असं म्हणत आयुष्य सरत जातं आणि सरणापर्यंत पोहोचतं.*
*आयुष्याच्या पेपरमधील प्रश्न आपल्या विषयाच्या पेपर सारखेच असतात. उदाहरणार्थ -*
*एका वाक्यात उत्तरे द्या...प्रश्न एका वाक्याचा असतो पण अनेक वाक्ये लिहावी लागतात.त्यामुळे प्रश्न एका वाक्याचा आहे की दिर्घोत्तरी हेच कळत नाही...*
*आणि वाक्यात तोंडावर बोलावं तर कोणतं वाक्य चुकेल सांगता येत नाही..*
*आयुष्यातील जोड्या जुळवा हा प्रश्न तर सगळ्यात कठीण. प्रश्न... येथेच आयुष्याचा निम्मा पेपर ठरला जातो.येथे प्रश्नांचं उत्तर चुकले की मग आयुष्यभर प्रश्नच प्रश्न..*
*एकदा चुकली जोडी की मग राहत नाही गोडी..*
*संदर्भासहित स्पष्टीकरण तर...😄 स्पष्टीकरण संपेल.. पण संदर्भ काही संपणार नाहीत. असे हे प्रश्न असतात..*
*योग्य पर्याय आपल्याला निवडावे लागतात. काही आपल्यासाठी तर काही दुसऱ्यांसाठी. काही नाईलाजास्तव तर काही मनासाठी... आपण हे किंवा ते पर्याय निवडत असतो ..*
*कारणे द्या तर असा प्रश्न असतो की कारणे नेमकी मीच का द्यायची?*
*कधी कधी नको असलेल्या प्रश्नांची सुद्धा कारणे द्यावी लागतात. आणि ती कारणे पुढच्याला योग्य वाटली तर बरं... नाहीतर कारणाची कारणे द्यावी लागतात...*
*अशी बरीच मोठी प्रश्नपत्रिका असते..*
*आज झोपलात आणि उद्या सकाळी उठल्यावर यापैकी कोणत्या विषयाचा पेपर तुमच्या पुढ्यात असेल सांगता येत नाही.*
*पण या प्रश्नपत्रिकेचे गुणदान केले जात नाही तर काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहतात..आपण शोधलेल्या उत्तराची गोळा बेरीज करीत राहतो आणि पास की नापास करीत राहतो आणि आयुष्य कधी सरत जाते कळतही नाही..*
*पण हीच तर आयुष्याची गमंत आहे.* *हेच प्रश्न सोडवत आयुष्याचा रिकामा पेला भरून घ्यायचा असतो. कधी सुखाच्या भागाने,कधी आनंदाने आणि कधी चेहऱ्यावरील हास्याने...*
*पण आयुष्याची कोजागिरी कधी मावळू द्यायची नाही.*
*वि.दा. करंदीकर म्हणतातच की,*
*असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर!*
*नजर देऊनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर!.*
*भलेही आयुष्यातील काही उत्तरे अनुत्तरित राहतील. पण मूत्यू शय्येवर पोहाचल्या नंतर असे मनाला वाटले नसले पाहिजे की अरेरे! हा प्रश्न पाहायचा राहूनच गेला ...😊*
✍️
*प्रसाद सुतार*
*९९७०८२०२२७*
लेख आवडल्यास नक्की शेअर करा
आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की लेखनास बळ देतील..😊🙏
*✍️*
*आपण प्रत्येक इयत्तेच्या प्रश्नपत्रिका सोडवून पाहिल्या,स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या इतर कित्येक प्रश्नमंजुषा पाहिल्या असतील.*
*यातील काही सोप्या असतील तर काही अवघड..काही आयुष्याला भाकरी ही देणाऱ्या ठरल्या असतील.*
*पण आता एक प्रश्नपत्रिका दररोज आपल्या समोर येते... ज्याने आपल्या दिवसाची सुरूवात होते आणि त्यानेच ग्लानी येते..ती म्हणजे आयुष्याची प्रश्नपत्रिका होय.*
*पण येथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते बरं का ?आणि उत्तरे पण वेगळी असतात... आणि हो यासाठी लागणारा वेळ ही वेगवेगळ्या प्रश्नाच्या काठीण्य पातळीवर ठरलेला असतो. कोणाला अगदी एक मिनिट तर कोणाला उभे आयुष्य गेले तरीही हे प्रश्न सुटत नाहीत...आणि सुटलेच तरी गणिताच्या उत्तराप्रमाणे अचूकपणा देतील असे नाही..*
*या प्रश्नांना वेळ नाही... काळ नाही... कधी कोणती प्रश्नपत्रिका समोर येईल सांगता येत नाही... पण हे प्रश्न सोडविल्याशिवाय इलाज नाही. सोडून ही चालत नाही... आणि येथे पर्याय ही नाही... कारण ते आपल्याशी निगडीत असतात.*
*कधी कधी हे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला पैसा, तर कधी माणसे, तर कधी वेळ हवा असतो. या पलीकडे प्रश्न पत्रिका आयुष्याची नसतीच...हे वेळेवर भेटले नाहीतर आपली स्थिती समुद्रात भरकटलेल्या जहाजासारखी होऊन जाते.... जी सरळ काठावर येत नाही आणि तिला योग्य दिशा ही सापडत नाही... मग मात्र आयुष्याचे होकायंत्र बिघडते...*
*एकवेळ शाळेचा पेपर,स्पर्धापरीक्षेचा पेपर सोडवताना एकमेकांना विचारून पाहून सोडवू शकतो. पास होऊ* *शकतो.पण आयुष्याचा पेपर ज्याचा त्यानेच सोडवावा लागतो...येथे तुम्ही पास होत नाही तर समाजाच्या नजरेत यशस्वी आणि अयशस्वी ठरत असता.*
*आयुष्याचा पेपर तुमच्या* *स्वकर्तृत्वावर, तुमच्या चरित्र्यावर, तुमच्या कष्टावर, तुमच्या आचरणावर अवलंबून असतो...आणि या पेपरला अमर्यादित वेळ असतो..काही जणांचे पेपर असे असतात की ते जग सोडून जातील पण पेपर काय सुटत नाही...*
*आणि शोधत असलेल्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहतात..पुढे प्रश्न सुटेल असं म्हणत आयुष्य सरत जातं आणि सरणापर्यंत पोहोचतं.*
*आयुष्याच्या पेपरमधील प्रश्न आपल्या विषयाच्या पेपर सारखेच असतात. उदाहरणार्थ -*
*एका वाक्यात उत्तरे द्या...प्रश्न एका वाक्याचा असतो पण अनेक वाक्ये लिहावी लागतात.त्यामुळे प्रश्न एका वाक्याचा आहे की दिर्घोत्तरी हेच कळत नाही...*
*आणि वाक्यात तोंडावर बोलावं तर कोणतं वाक्य चुकेल सांगता येत नाही..*
*आयुष्यातील जोड्या जुळवा हा प्रश्न तर सगळ्यात कठीण. प्रश्न... येथेच आयुष्याचा निम्मा पेपर ठरला जातो.येथे प्रश्नांचं उत्तर चुकले की मग आयुष्यभर प्रश्नच प्रश्न..*
*एकदा चुकली जोडी की मग राहत नाही गोडी..*
*संदर्भासहित स्पष्टीकरण तर...😄 स्पष्टीकरण संपेल.. पण संदर्भ काही संपणार नाहीत. असे हे प्रश्न असतात..*
*योग्य पर्याय आपल्याला निवडावे लागतात. काही आपल्यासाठी तर काही दुसऱ्यांसाठी. काही नाईलाजास्तव तर काही मनासाठी... आपण हे किंवा ते पर्याय निवडत असतो ..*
*कारणे द्या तर असा प्रश्न असतो की कारणे नेमकी मीच का द्यायची?*
*कधी कधी नको असलेल्या प्रश्नांची सुद्धा कारणे द्यावी लागतात. आणि ती कारणे पुढच्याला योग्य वाटली तर बरं... नाहीतर कारणाची कारणे द्यावी लागतात...*
*अशी बरीच मोठी प्रश्नपत्रिका असते..*
*आज झोपलात आणि उद्या सकाळी उठल्यावर यापैकी कोणत्या विषयाचा पेपर तुमच्या पुढ्यात असेल सांगता येत नाही.*
*पण या प्रश्नपत्रिकेचे गुणदान केले जात नाही तर काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहतात..आपण शोधलेल्या उत्तराची गोळा बेरीज करीत राहतो आणि पास की नापास करीत राहतो आणि आयुष्य कधी सरत जाते कळतही नाही..*
*पण हीच तर आयुष्याची गमंत आहे.* *हेच प्रश्न सोडवत आयुष्याचा रिकामा पेला भरून घ्यायचा असतो. कधी सुखाच्या भागाने,कधी आनंदाने आणि कधी चेहऱ्यावरील हास्याने...*
*पण आयुष्याची कोजागिरी कधी मावळू द्यायची नाही.*
*वि.दा. करंदीकर म्हणतातच की,*
*असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर!*
*नजर देऊनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर!.*
*भलेही आयुष्यातील काही उत्तरे अनुत्तरित राहतील. पण मूत्यू शय्येवर पोहाचल्या नंतर असे मनाला वाटले नसले पाहिजे की अरेरे! हा प्रश्न पाहायचा राहूनच गेला ...😊*
✍️
*प्रसाद सुतार*
*९९७०८२०२२७*
लेख आवडल्यास नक्की शेअर करा
आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की लेखनास बळ देतील..😊🙏
❤23👍2
त्याच्यावर कोयता चालवणं म्हणजे देशद्रोह नव्हे का?
-मतभेद सगळ्यांनाच असतात –
पण विचारांच्या विरोधाला जर हिंसक रूप दिलं,
तर हा समाज अराजकतेकडे घसरतो.
आणि हीच घसरती पायरी थांबवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
**महात्मा गांधी हे व्यक्ती नसून विचार आहेत, आणि त्या विचारांवर हल्ला करणाऱ्याला तुरुंगातच जागा असावी!
गांधींच्या विचारांशी सहमत नसाल, चालेल…
पण त्यांच्यावर हल्ला कराल, तर देश तुम्हाला विचारांनीच चिरडेल!
अमन देशमुख.....
#Gandhi
#puneincident
-मतभेद सगळ्यांनाच असतात –
पण विचारांच्या विरोधाला जर हिंसक रूप दिलं,
तर हा समाज अराजकतेकडे घसरतो.
आणि हीच घसरती पायरी थांबवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
**महात्मा गांधी हे व्यक्ती नसून विचार आहेत, आणि त्या विचारांवर हल्ला करणाऱ्याला तुरुंगातच जागा असावी!
गांधींच्या विचारांशी सहमत नसाल, चालेल…
पण त्यांच्यावर हल्ला कराल, तर देश तुम्हाला विचारांनीच चिरडेल!
अमन देशमुख.....
#Gandhi
#puneincident
👍17❤9
जगभरातली युद्धग्रस्त परिस्थिती, तणाव व इतिहास बघितल्यावर देखील एक गोष्ट स्प्ष्ट होते,
"Religion Unites, धर्म जोडण्याचे काम करतो"
हे धादांत खोटे आहे.
पॅलेस्टाईन मध्ये इज्राएल चा नरसंहार सुरु असताना किती मुस्लिम राष्ट्र इज्राईल विरोधात उभी राहिली ? आणि ज्या राष्ट्रांनी उघड भूमिका घेतली ती मुस्लिम बहुल नसून ख्रिस्चन बहुल आहेत.
इज्राएल इराण युद्धाच्या वेळी मुस्लिम राष्ट्रांनी उघडपणे इराण ला मदत केली का ?
मदत करणारे , समर्थन करणारे देश रशिया, चीन हे मुस्लिम बहुल आहेत का ?
इजरायल च्या बाजूने उभा राहणार देश अमेरिका हा ज्यू धार्मिक बहुल नाही,
आणि जॉर्डन सारख्या मुस्लिम बहुल राष्ट्रांनी उघडपणे आणि काही देशांनी अप्रत्यक्ष ज्यू राष्ट्राला मदत केली.
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही विभिन्न धर्मीय आहेत का ?
दोन्हीच्या समर्थनार्थ असणारे देश धर्मामुळे समर्थन करत आहेत का ?
युरोपियन देशांमध्ये बहुसांख्य जनता एकाच धर्माची असूनही 'अखंड युरोप' का बनला नाही ? आणि तरीही तिथल्या बहुसंख्य देशांची प्रगती कशी झाली ?
धार्मिक कारणास्तव भारतापासून वेगळा झालेला देश पाकिस्तान एकसंध का नाही राहू शकला ?
अनेक उदाहरणे देता येतील......
मात्र भडकवण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी, युद्ध करण्यासाठी, नैसर्गिक साधनसंपत्तीची व इतर लूट करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी आणि या सर्व मार्गे सत्ता हस्तगत करण्यासाठी, टिकवण्यासाठी मात्र धर्माचा खुबीने वापर केला जातो. आणि याची उदाहरणे इतिहासात, साध्य, जगभरात आणि इथेही सहज बघायला मिळतील. म्हणून
"Religion Unites.... But 'AGAINST'
धर्म जोडतो पण कशाच्या तरी विरोधात "
असे म्हणता येऊ शकतं.
धर्माचा वापर सत्तेसाठी करणारे कावेबाज, क्रूर..... असू शकतात आणि करू देणारे .... असो.
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
❤9
कायद्याने एखाद्याच्या हातात तलवार देऊन त्याला वाट्टेल तेवढ्या कत्तली करण्याची मुभा दिली तर त्याचा शेवट दोन गोष्टींनी होण्याची शक्यता वाटते!
एकतर तो तलवार फेकून देईल आणि त्याच्या हाती तो अहिंसेचं प्रतिक असलेलं एखादं सुंदर फुल घेईल!
नाही तर त्याच तलवारीने तो कत्तली करत करत एकदिवस स्वतःचा जीव तरी घेईल!
गांधी आणि हिटलरचा,
जन्म आणि शेवट,
असा होत असतो!
म्हणूनच हिंसेचा महामहीम असलेल्या हिटलरने हाती फुल न घेता जीवन संपवण्याचं आत्मघातकी पाऊल उचललं!
आणि त्याचवेळी गांधींनी इंग्रजांविरुद्ध लढतांना तलवार झुगारून दिली, आणि हाती अहिंसक लढ्याचं सुंदर फुल पकडलं!
हिंसेची हार आणि अहिंसेचा विजय असा होत असतो!
"गांधी मरत का नाही?" असं जेव्हा कुणी म्हणत असतं तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वरील विवेचनात सापडतं!
गांधीला मारणं म्हणजे अहिंसेला मारणं आहे!
जग अस्तित्वात असेपर्यंत गांधी कधी मरणार नाही,
कारण अहिंसा अमर असते!
तुम्हाला काय वाटतं ?
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
❤8
रागही येतो आणि दयाही येते!
सुरज शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने पुणे रेल्वे स्टेशन समोरील गांधी पुतळ्यावर काल रात्री कोयत्याने वार केले. त्याला गांधींच्या पुतळ्याचे डोके उडवायचे होते पण उंची कमी पडल्याने त्याला ते जमलं नाही असं एबीपी माझाच्या बातमीत ऐकलं. तसंही गांधींची उंची गाठणं सगळ्याच अर्थाने त्याला अवघडय.
स्वतःच असं काहीही कर्तृत्व नसल्याने केवळ द्वेषपेरणीची मोहीम राबवून आणि समाजासमाजात झगडे लावून आपलं उद्दिष्ट साध्य करून घेणाऱ्या प्रवृत्तीनं गांधींचा खून केला तरी तो गांधी यांचा काही पिच्छा सोडत नाही. शरीराने नव्हे तर विचाराने अडसर बनून गांधी पुन्हा पुन्हा यांच्या मार्गात आडवा येतो. गांधींच्या काही विचारांशी तुम्ही असहमत असू शकता आणि त्याचा वैचारिक प्रतिवाद करण्याची तुम्हाला संधी आहे पण तुम्ही पडले जन्मजात विचारशत्रू. द्वेषानं भरलेलं तुमचं मन विचार करण्याच्या बाबतीत पांगळं बनलंय.
सतिश शुक्लाचा राग येतो. त्याच्या या कृत्याची त्याला शिक्षा व्हायलाच हवी. पण त्याची दया यासाठी येते की, त्याच्या सारख्या अनेक लोकांच्या मनात द्वेषपेरणी करणारी जी विचारसरणी आहे, ती आपल्या हिनकस राजकारणासाठी या लोकांचा वापर करतेय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये.
अशा तरुणाई सोबतची संवाद मोहीम आणखी सकस आणि गतिमान करण्याची गरज आहे.
Subhash Ware
सुरज शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने पुणे रेल्वे स्टेशन समोरील गांधी पुतळ्यावर काल रात्री कोयत्याने वार केले. त्याला गांधींच्या पुतळ्याचे डोके उडवायचे होते पण उंची कमी पडल्याने त्याला ते जमलं नाही असं एबीपी माझाच्या बातमीत ऐकलं. तसंही गांधींची उंची गाठणं सगळ्याच अर्थाने त्याला अवघडय.
स्वतःच असं काहीही कर्तृत्व नसल्याने केवळ द्वेषपेरणीची मोहीम राबवून आणि समाजासमाजात झगडे लावून आपलं उद्दिष्ट साध्य करून घेणाऱ्या प्रवृत्तीनं गांधींचा खून केला तरी तो गांधी यांचा काही पिच्छा सोडत नाही. शरीराने नव्हे तर विचाराने अडसर बनून गांधी पुन्हा पुन्हा यांच्या मार्गात आडवा येतो. गांधींच्या काही विचारांशी तुम्ही असहमत असू शकता आणि त्याचा वैचारिक प्रतिवाद करण्याची तुम्हाला संधी आहे पण तुम्ही पडले जन्मजात विचारशत्रू. द्वेषानं भरलेलं तुमचं मन विचार करण्याच्या बाबतीत पांगळं बनलंय.
सतिश शुक्लाचा राग येतो. त्याच्या या कृत्याची त्याला शिक्षा व्हायलाच हवी. पण त्याची दया यासाठी येते की, त्याच्या सारख्या अनेक लोकांच्या मनात द्वेषपेरणी करणारी जी विचारसरणी आहे, ती आपल्या हिनकस राजकारणासाठी या लोकांचा वापर करतेय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये.
अशा तरुणाई सोबतची संवाद मोहीम आणखी सकस आणि गतिमान करण्याची गरज आहे.
Subhash Ware
👍12❤8
जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात.
मग,
रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे?
खते, बियाणे,
निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे?
आणि
आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?
मग,
रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे?
खते, बियाणे,
निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे?
आणि
आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?
👌55❤12🫡11🔥8