Telegram Web Link
पहलगाममधील हल्ल्याच्या मुळाशी...
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संरक्षण व परराष्ट्र धोरण विश्लेषक
पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यातून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे बदलते तंत्र समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘टार्गेटेड किलिंग’चा प्रवाह काश्मीरमध्ये दिसून येतच होता; पण धर्म विचारून हत्या करण्यातून दहशतवाद्यांना सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आहे. पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना या धार्मिक आधारावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ताज्या हल्ल्याच्या माध्यमातून इतर धर्मियांनी जम्मू-काश्मीरमध्ये येऊ नये असा इशारा दहशतवाद्यांना द्यावयाचा आहे.
https://youtu.be/aMi7utJ5Avs?si=wDhmDq4TjUuD-iG8

पाकिस्तानने नेहमीच भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रसंगांवेळी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले किंवा शस्रसंधीचे उल्लंघन असे प्रकार केलेले आहेत. गतवर्षी पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा पार पडत असताना, शेजारी राष्ट्रांचे प्रमुख भारतात आलेले असताना दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौर्‍याकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले असताना त्याआधी कठुआमध्ये हल्ला घडवून आणला होता. सन २००० मध्ये बिल लिटंन भारतभेटीवर आले होते आणि भारतीय संसदेत ते भाषण देत होते त्यावेळीही अशाच प्रकारचा हल्ला काश्मीरमध्ये झाला होता.यामागे एक सुनियोजित रणनीती आहे, ती म्हणजे पाकिस्तानला अशा प्रकारचे हल्ले करुन काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करायचे आहे.
भारतीय सैन्य दलांना पूर्ण सूट - पंतप्रधान नरेंद्र मोदी | विश्लेषण करत आहेत डॉ. शैलेंद्र देवळाणकर.

https://youtu.be/ftbFzbQ5kNk?si=KQRjNhqdj3UN7hwq
2025/06/27 14:41:48
Back to Top
HTML Embed Code: