Telegram Web Link
🙏*चिंतन*🙏
*आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जो पर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते, तो पर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता, परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरूवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही! अशाचप्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूरासारखे भक्त राहात होते, तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले, तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की 'काका! आपण तीर्थयात्रेला जावे'. जसे विदुरने हस्तिनापूर सोडले, कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही !! याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तो पर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो. विचार करा! एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते, आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेंव्हा आपला त्याग करते... तेंव्हा पासून आपली ओहटी सुरु होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमाऊन खातो, ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त, भक्ती करत असेल, तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा !! सोबत काही घेऊन आलो नाही व जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा..!*
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
जननायक बिरसा मुंडा ह्यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!💛💐🙏
"सामाजिक अस्मितेसाठी , सामाजिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी आंदोलन करुन धैर्याने शौर्याचा नवा इतिहास घडविला.बिरसा हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी ख्रिश्चन मिशनरी स्कूल मधे टाकले होते पण तेथे इतर धर्मियांना प्रवेश देण्यात येत नसे. दिला तर त्यांचे धर्मांतर केल्या जात असे व आपला धर्म स्वीकाराय लावतं आणि धर्म ग्रंथ देत.धर्म स्वीकाराय लावुन. आदिवासींच्या जमिनीवर अधिकार करून घेण्याचा इंग्रजांचा हा दृष्टीकोन बीरसांनी ओळखला व ते आपल्या गावी परत आले. व त्यांनी सहकार्यांना घेऊन अन्याय अत्याचार करणाऱ्या इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी उठाव करण्यासाठी क्रांतीची ज्वाला आदिवासींच्या मनात भडकवली.उलगुलान.उलगुलान हा नारा दिला. उलगुलान म्हणजे प्रचंड विद्रोह. त्यांनी अनेक क्रांतिकारी उठाव केले. जल ,जंगल आणि जमीनीचा अधिकार मिळविण्यासाठी फक्त आदीवासींनाच नाही तर समस्त भारतीयांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच जगणं शिकवणाऱ्या आणि अवघं 25 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या ह्या महान क्रांतिकारकारास शतशः नमन..!"💛
✍️ N.P.Dhanve.
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
जगातील कठीण प्रश्नाचे बुद्धाने दिलेली उत्तरे 👍💙
Forwarded from B K
नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत वाचा...🙏😊

जे लोक आपल्या मित्रांचे,घरातील व्यक्तींचे,पाहुण्यांचे, शेजाऱ्यांच्ये मन जपण्याचा प्रयत्न करतात, त्याच लोकांच्या आयुष्यात दुःख,संघर्ष,त्रास येतो,त्यांनाच चुकीचे ठरवलं जाते😔आणि शेवटी सगळ्या गोष्टींचे खापर त्या व्यक्तीवर फोडले जाते..
घरातील लहान मोठे कर्ते पुरुष,भाऊ त्यांच्या जन्मापासून मरेपर्यंत नेहमी आईवडील,बहीण,काकाकाकु ह्यांच्यासाठी झगडत असतो😳डोक्यावर नेहमी घराच्या अपेक्षांचं,जबाबदारीच ओझ असत,सावत्र आईच्या वचनासाठी भगवान प्रभुरामालाही वनवास भोगावा लागला,राजा असून पदरात वनवास भेटला,घरातील मुलगा लहानपणापासून घरापासून लांब शिक्षणासाठी,नोकरीसाठी सर्वांना सोडून घराच्या भविष्यासाठी रक्ताच पाणी करतो,वेळप्रसंगी तो उपाशी राहून घरी सर्वांची बरोबरी करतो😔स्वतःच्या इच्छा,आवडी मारून टाकतो,ते फक्त सर्वांच्या आई,बहिणीच्या आनंदासाठी..त्यात सगळ्यात मोठा भाऊ म्हणलं तर त्याच्यावर तर पूर्ण परिवाराची जबाबदारी असते,मोठ्या बहिणीपासून ते लहान भावापर्यंत लहानपणापासून त्याचा वाट्याला नेहमी संघर्ष,दुःख,समाजाचा त्रास,टोमणे ह्या सगळ्यागोष्टी मोठा भाऊ,पुरुष सहन करतो..लग्नानंतरही भावाची साथ ही नेहमीच बहिणीच्या सोबत असते,बहिणीचे लग्न होते तेव्हा सगळे रडतात,परंतु भावाला(पुरुषाला)सगळ्यांसमोर रडता येत नाही,तो एकटा कोपऱ्यात जाऊन रडतो,त्याची समजूतही काढायला कोणी नसत😔एवढं सगळा त्रास,संघर्ष करूनही त्याला चुकीचं ठरवलं जातं,शुल्लक कारणांवरून वाद घातला जातो कारण जो सर्वांची मने जपून ठेव्याच्या प्रयत्न करतो,सत्याने वागतो त्याच्याच वाट्याला दुःख येतात,तेही तो एका हास्यामागे लपवतो,कारण त्याच अस्त्तिव समजून घेणार कोणी नसतंच..😔
.............🦋🌺🙏............
लेखन-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास शेयर करा
Forwarded from ओम sm शेळके
‌आयुष्यात आपल्याला जर स्वतःच अस्तित्व तयार करायचं असेल तर जरा अपमान सहन करावा लागेल थोडं अपयश पचवावं लागेल काही प्रमाणात लोकांचे टोमणे सुद्धा एकावेचं लागतील तरचं आपल्यात यशस्वी होण्याची जिद्द निर्माण होईल आणि स्वतःवरचा आत्मविश्वास पण वाढेल म्हणून जे काही आपल्यासोबत वाईट घडत ते होणं आपल्यासाठी खूप गरजेचं असतं कारण ते स्वतःला सांगायला पुरेस असते की आयुष्य नावाची स्पर्धा अजून संपलेली नाही कारण मी अजून हरलो नाही,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from Vinayak Bhise
आज वटपौर्णिमा
सखे जन्मोजन्मी तुझ मिळावी
हेच मागण मागतो देवाला

सखे तुझ्या प्रत्येक इच्छा अपेक्षा
स्वप्ने पूर्ण लवकरात लवकर होवीं
सखे जे जे हवं आहे ते ते तुला मिळावं

सखे नेहमी खुश हॅप्पी
आनंदी सुखी निरोगी रहावी
बांधतो मी धागा, घालतो मी फेरे वडाला
मागतो मी देवाला सखे तुझ्यासाठी
सुखी निरोगी दीर्घायुष्य आणि
सखे जे जे हवं आहे ते ते
सर्व काही तुला मिळावं

सखे बांधतो मी धागा
घालतो मी फेरे वडाला
इवढच मागण मागतो देवाला

सखे सात जन्मोजन्मीच
सुख या जन्मी तुला मिळव


✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
Forwarded from ओम sm शेळके
सुखं समाधान आणि आनंद याचं एकत्रित करण म्हणजे आपलं लहानपण हे एकत्रित करणं आपल्या जीवनात पुढे कायम ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असतात त्या आपल्या गरजा कमी असणे कारण बालपणी आपल्या गरजा आणि अपेक्षा थोड्या होत्या मात्र प्रत्येक लहान लहान गोष्टीत आनंद होत होता पण हल्ली आशा अपेक्षा आणि गरजेपोटी माणूस फार चिंगळा गेला म्हणून म्हणत्यो मोठेपणी पण जरा लहान होऊन जगुया या आयुष्याच्या भागडलीत  थोड का होईना आपल्याचं बालपणीच्या आठवणीत रमुया,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
प्राथमिक शिक्षण आणि अभ्यास जीवनाचा पाया नक्की वाचा हा लेख..
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
नक्की वाचा ही कविता..
❤️
Forwarded from Vinayak Bhise
झोपेत मेलेल बरं

रात्र सरता सरत नाही
आठवांचा भार
झोपही येईना डोळ्यांना
जीव होई बेजार

दिवसभर कामात मी
मन माझं रमेना
तुझ्याविना जगणं हे
काहीच आता जमेना

सकाळ होताच पुन्हा
तीच भयाण शांतता
तुझ्याविना माझ्या
आयुष्यात उरली नाही

कोणतीच सार्थकता
शब्द ओठांवर येतात
पण ओठातून सरेना
झोपेतच मृत्यू येवो
हेच आता खरं

स्वप्नात तरी भेटशील तू
या आशेवर जगावं
पण जाग येताच पुन्हा
त्याच वास्तवाला सामोरे जावं
झोपेतच मृत्यू येवो
हेच आता खरं

तुझ्या आठवांच्या गर्दीत
शांतपणे विरावं
डोळे मिटून घेता
तूच सामोरी येतेस
हसताना, बोलताना
मला जवळ घेतेस

पण डोळे उघडताच
तू नसतेस सोबत
या विरहाचं दुःख
आता असह्य होतं

देवा, एकच वर दे
आता मला मागणं
झोपेतच मृत्यू दे
शांतपणे मला घेणं

त्या स्वप्नांच्या दुनियेत
जिथे तू आहेस माझी
तिथेच कायमचं रहावं
हीच इच्छा माझी

विनायक भिसे , बारामती
Mo. 7798150143
आयुष्य खूप अप्रत्याशित आहे...

तुम्ही सुट्टीची योजना आखता आणि दहशतवादी गोळीबार करतात.

तुम्ही क्रिकेट स्पर्धेतील विजयाच्या विजयी परेडला उपस्थित राहता आणि ते चेंगराचेंगरीत रूपांतर होते.

तुम्ही कामासाठी किंवा विश्रांतीसाठी विमानात चढता आणि ते अपघातात होते.

तुम्ही फक्त तुमच्या वसतिगृहात शिकत असता किंवा मेसमध्ये जेवत असता... आणि आकाशातून विमान कोसळते.

आपण वेळेवर नियंत्रण ठेवल्यासारखे योजना आखतो पण प्रत्यक्षात काहीही आपल्या नियंत्रणात नसते.

तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या प्रियजनांना 'निरोप' देता तेव्हा तुम्ही खऱ्या प्रेमाने आणि काळजीने बोलावे.

परिस्थिती कोणत्याही क्षणी बदलू शकते.

दयाळू राहा.

जीवनाचे मूल्यमापन करा.

देवाचे आभार माना 🙏🏻
Forwarded from B K
"क्षणभुंगार आयुष्याची राख"..(नक्की वेळकाढून शेवटपर्यंत वाचा)

  जीवन हे खरच सर्वांसाठीच क्षणभंगुर आहे हे मागील घडलेल्या मुंब्रा रेल्वे अपघात,अहमदाबाद विमान दुर्घटना,पहलगाम हल्ला ह्यातून कळून येते.तुम्ही यात्रेत असा किंवा मेसमध्ये जेवण करत असा,विद्यार्थी अथवा प्रवासी मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे😞जन्माची कल्पना माणूस काही दिवस आधी देऊ शकतो परंतु मृत्यू कधी येईल ह्याची कल्पना कुणालाच नसते,जेव्हा माणसे जग सोडून जातात,तेव्हा RIP किंवा miss you म्हणून स्टेटस ठेवतात पण माणूस जिवंत असताना कधी त्यांची किंमत करत नाहीत..😢एकदा का माणूस ह्या जगातून गेला तेव्हा तुम्ही कितीही रडले,दुःख व्यक्त केले तरीही ते निरर्थकच.आयुष्य जगताना माणूस कुठपर्यंत स्वतःच विचार करणार,माणसाने स्वतःचा विचार नक्की करवा परंतु आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही,मन दुखणार नाही ह्याचीही काळजी घ्यावी🤝.
   कधी,केव्हा आणि कोण ह्या जगातून जाईल काही माहिती नसते,म्हणून वाद,मतभेद सोडून सर्वांनी एकमेकांशी बोलत चालत चालावे😔शेवटी सगळेच मातीतच सामवणार आहेत तरीही माणसांना जिवंतपणी माणुसकी कशी समजत नाही?कधी सहज आपल्या मित्रांची आपण विचारपूस करावी,असे का वाटत नाही😳रोज 24 तास कोणीही busy नसते आणि इथे काहींना प्रश्न येतो attitude आणि self respect चा मीच का आधी बोलू?काही दिवस बोलण झाले नाहीतर लोक ओळख बुडवतात हे खरे असलेतरीही अहो पण एकदा का माणूस हे जग सोडून गेल्यास काय करणार त्या attitude ला,मातीत घालणार का?..😔आजकाल कामापुरते कॉल,मेसेजेस व स्टेटस पाहण्यापर्यंत आपुलकी,स्नेह आणि पैश्यपूरते नाते,मैत्री मर्यादित झालेली आहे,काही अपवादही असतील..माणसे मेल्यानंतर किंवा दूर गेल्यास miss you म्हणण्यापेक्षा इतरांना आधार देऊन,सहकार्य देऊन always with you म्हणलं तरीही समोरच्याच्या जीवन जगण्याला नक्की पालवी फुटते😇इतरांच्या प्रगतीवर जळण्यापेक्षा,इतरांच्या आयुष्यात मदत करून आधार देऊन स्वतःचे आयुष्य जाळत राहिले तर खरे समाधान मिळेल..😊हसतखेळत आयुष्याच्या प्रत्येक क्षण आनंदात जगा,आवडेल ते नक्की करा काय माहित कोणता क्षण शेवटचा असेल..?दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐
..................🦋🌺🙏.................
लेखन-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-
7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास शेयर करा
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
बाप... 💙
"कोट्यावधी लोकांच जीवन बदलवणारा, जग बदलवणारा एक बापमाणूस म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर... बाबासाहेब हे आमच्या बापाचे बाप आहेत म्हणून अश्या बापाला कोटी कोटी प्रणाम..."
# Happy Father's Day💙
✍️ABC'S Diaries
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
लक्ष 😁😂
✍️"सद्याच्या काळात लोकांना स्वतः च्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यावर बोलण्यात जास्त मजा वाटते.. कुणाच कोणासोबत आहे..?कोणाची गर्लफ्रेंड कोणती आहे? कोणाच लग्न बाकी आहे? ज्याचं लग्न होणं बाकी आहे त्याच्याकडे जावून जाणूनबुजून त्याला विचारणार लग्न कधी करता?😂एखादा बेरोजगार व्यक्ती असेल तर त्याला जावून विचारणार काय चालू आहे मग?😁जमलं की नाही कुठे..? इथे ह्याच्या स्वतः च्या जिंदगीचा पार उन्हाळा झाला तरी ह्याला चिंता दुसऱ्याची अशी अवस्था आहे.. खरतर अश्या घाणेरड्या सवयी मोडल्या पाहिजे.. लोकांचा विचार,लोकांच टेन्शन घेण्यापेक्षा स्वतः च्या आयुष्याकडे लक्ष द्या..ज्याच तो पाहत बसेल आपण का उगाच त्यावर वेळ गमवायचा..? म्हणून स्वतः कडे लक्ष द्या.."
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी,शिक्षक जि. बुलढाणा)
लिखाण दी. 15जून 2025
लेख कसा वाटला याबद्दल
प्रतिक्रिया नक्की कळवा 😁
✍️संपर्क -:8806379959
✍️
@ABCs1432
Forwarded from Vinayak Bhise
बाप समजायला बाप होव लागतं,
जबाबदारी च ओझ अनुभव लागतं

बाप उभा असतो,
घराचं छत होऊन
ऊन, वारा पाऊस झेलत,
कधी न थकता
कधी तो दिसतो कठोर
कधी शांत, तर कधी रागीट
मनात अनेक भावना दडवतो

मात्र चेहऱ्यावर हसू
ठेवून जगत असतो

आपल्या लेकरांसाठी तो झिजतो
न बोलता, न सांगता
मनातच सारं काही साठवतो

त्याने पाहिलेली स्वप्नं
अपुरी राहिलेली
म्हणून आपल्या पोरांची
स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
रात्र दिवस राबतो

पोरांच्या आनंदात तो खुश होतो
पोरांच्या यशात तो आपलं यश पाहतो,
आणि प्रत्येक पावलावर
पोरांना सोबत राहुनी आधार देतो

जो पर्यंत बाप जिवंत आहे
तो भिऊ नकोस मी आहे ना
अस हजार वेळा पोरांना सांगत असतो

त्याचे डोळे बोलतात, जरी ओठ शांत
त्याच्या मनाची खालमेल मात्र
कोणालाच कळत नाही

बापाच्या कष्टाचं मोल
पोरांना कधी वेळेवर कळतंच

बाप समजायला बाप होव लागतं
तेव्हाच कळतं
बाप म्हणजे कोण असतो

त्याग, निस्वार्थ प्रेम, संयम , माया
सगळ्याची मूर्ती म्हणजे तो बाप.

बाप स्वतःच्या ओंजळीत घेतो
तो सारं दुःख
पोरांसाठी मात्र आयुष्यभर
वाटतो तो सुख

पोरांना जे मला मिळालं नाही
ते सारं सुख सुविधा मिळावे
त्यासाठी तो धडपडत असतो

म्हणूनच,
बाप समजायला बाप होव लागतं

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
भाग्य आपल्या हातात नाही,पण....
निर्णय आपल्या हातात आहेत.
भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही पण....
निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात.

Good Night 🌃
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
राष्ट्रमाता...
✍️ "महाराष्ट्राच्या भूमीत ज्यांनी स्वराज्याचा बिजरोपण केलं...
लाख मुलखाचा हा प्रदेश ज्यांनी एकत्र आणत मराठी माणसाच्या रक्तात स्वाभिमान जागवला....
त्या स्वराज्यनिर्मात्या, राजमाता जिजाऊ माँसाहेब,याच्या पावन स्मुर्तीस त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...🙏
कोटी कोटी प्रणाम...
🙏🙏🙏💐💐💐💐
✍️ ABCs Diaries 📚
2025/06/27 19:03:02
Back to Top
HTML Embed Code: