2531) 1921 चा मोपला उठाव जो ब्रिटिश राजवट आणि हिंदू जमीनदारांविरुद्ध होता, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?
Anonymous Quiz
43%
केरळ
28%
उत्तर प्रदेश
27%
बंगाल
2%
मुंबई
👍14❤6🙏4
2532) ब्रिटिशांच्या कोणत्या धोरणाने आदिवासींच्या जमिनीच्या मालकी हक्कावर मोठा परिणाम केला आणि आदिवासींमध्ये व्यापक असंतोष निर्माण केला, ज्यामुळे बंडांना चालना मिळाली?
Anonymous Quiz
7%
धार्मिक हस्तक्षेप
80%
वन कायदे आणि जमीन करार
8%
तैनाती फोज
5%
दत्तक वारस नामंजूर धोरण
❤21👍5
भारताचा शोध ज्याला घ्यायचा आहे, त्याने अहमदनगर( अहिल्यानगर) नावाचे थोर गाव पाहायला हवे.
नेहरूंना इथेच तर भारत सापडला. इथल्याच किल्ल्यात त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ लिहिला. साने गुरूजींनी त्याचा मराठी अनुवाद लगोलग केला. एवढा महान, महाकाय ग्रंथ नेहरूंनी तुरूंगात लिहिला, तेव्हा त्यांच्याकडे संदर्भासाठी आवश्यक असणारी पुस्तकं नव्हती. केवळ स्मरणशक्ती, विलक्षण आवाका, व्यापक आकलन आणि अफाट प्रतिभेच्या बळावर नेहरूंनी हे थक्क करणारे पुस्तक लिहिले. नेहरूंचे बरेचसे लेखन तुरुंगात झाले. ते सतरा वर्षे पंतप्रधान होते, हे आपल्याला ठाऊक असतेच. मात्र, स्वातंत्र्यलढ्यात अकरा वर्षे ते तुरुंगात होते. तुरुंगात जाताना ते गंमतीने म्हणायचे, ‘चला! आता नवं काही लिहून होईल!’
“काय नेहरू, नवं काय लिहिताय?”, असं कोणीतरी विचारल्यावर एकदा ते म्हणाले होते, “खूप दिवस तुरुंगात नाही गेलो. त्यामुळं वेळच नाही मिळाला.”
नेहरूंना ब्रिटिशांनी १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनानंतर अहमदनगर किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. त्यांच्यासोबत सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, गोविंद वल्लभ पंत आणि इतर नेते होते. हे सर्वजण १९४५ पर्यंत म्हणजे सुमारे तीन वर्षे अहमदनगर किल्ल्यात कैदेत होते.
तिथे नेहरूंनी हा ग्रंथ लिहिला. अहमदनगर किल्ल्यातील एका छोट्याशा खोलीत बसून तो लिहिला. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत आणि अन्यत्रही त्यांनी अहमदनगरविषयी खूप भावनिक उल्लेख केले आहेत.
नेहरू लिहितातः
“The old fort of Ahmednagar, ancient and massive, surrounded by deep moats and high walls, has become our residence and our world for some time to come.”
अहमदनगर हे, आपला जन्मदिन माहीत असलेले एकमेव ऐतिहासिक शहर. अहमदनगर शहराची स्थापना इ.स. १४९० मध्ये, २८ मे रोजी अहमद निजामशहा पहिला याने केली. त्या दिवशी त्याने याच भुईकोट किल्ल्याच्या परिसरात नवी राजधानी उभारली आणि तिचे नाव स्वतःच्या नावावरून ‘अहमदनगर’ असे ठेवले. बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर निजामशाही या स्वतंत्र सत्तेचा उदय झाला. निजामशाही काळात हे शहर शिक्षण, कला, संस्कृती, व्यापार आणि प्रशासन यांचे केंद्र बनले. अहमदनगरचा किल्ला या काळातल्या कैक घटनांचा साक्षीदार आहे.
अहमदनगर आणि औरंगाबादच्या इतिहासात मलिक अंबरचे स्थान खूप महत्त्वाचे. इथिओपियातला हा मुलगा. गुलाम म्हणून विकला जातो. भारतात येतो आणि सम्राट होतो! निजामशहा मुर्तजा दुसरा अल्पवयीन असताना, मलिक अंबरने राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला आणि निजामशाहीचे पुनरुज्जीवन केले. मुघलांच्या विशाल फौजांना धूळ चारली. डोंगर-दऱ्यांचा उपयोग करून शत्रूला फसवण्याचे, गनिमी काव्याचे तंत्र वापरले. मुघल सम्राट अकबर आणि त्याचा मुलगा जहांगीर या दोघांना त्याने अनेकदा पराभूत केले.
रयतवारीचा पाया अहमदनगरमध्येच रचला गेला. जमिनीची मोजणी करून प्रत्यक्ष उत्पादनावर आधारित करप्रणाली इथे सुरू झाली. शेतकर्याचा खूप बारकाईने विचार मलिक अंबर करत असे. जलसंधारण आणि सिंचनाच्या योजना इथे आखल्या गेल्या. मलिक अंबरने अनेक तलाव, बंधारे आणि कालवे बांधले. या काळात अहमदनगर आणि आसपासची शेती समृद्ध झाली. याच काळात अहमदनगर हे शिक्षण, संस्कृती, व्यापार आणि कारागिरीचे केंद्र बनले. धर्म, जात वा वंश असा भेद न करता, मलिक अंबरने प्रजेला समान वागणूक दिली. मलिक अंबर असेपर्यंत मुघलांना अहमदनगर कधीच जिंकता आले नाही.
तेव्हाच्या त्या पायावर आजचे अहिल्यानगर दिमाखात उभे आहे!
निजामशाही गेली. मग मुघल आले. औरंगजेबाचा अखेरचा काळ अहमदनगरमध्ये गेला. तो १७०७ मध्ये अहमदनगरजवळच गेला. त्यामुळे मुघल साम्राज्याच्या अखेरच्या श्वासांशीही अहमदनगर जोडले गेले.
मुघल सत्तेनंतर मराठ्यांनी अनेकदा अहमदनगरवर सत्ता मिळविण्याचे प्रयत्न केले. पेशवाईच्या काळात हे ठिकाण महत्त्वाचे ठाणे बनले. नंतर ब्रिटिशांनी मराठ्यांना पराभूत करून १८१७ मध्ये अहमदनगर आपल्या ताब्यात घेतले. या ब्रिटिश काळात किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून झाला. तिथे नेहरूंनी भारताचा शोध घेतला!
-संजय आवटे
नेहरूंना इथेच तर भारत सापडला. इथल्याच किल्ल्यात त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ लिहिला. साने गुरूजींनी त्याचा मराठी अनुवाद लगोलग केला. एवढा महान, महाकाय ग्रंथ नेहरूंनी तुरूंगात लिहिला, तेव्हा त्यांच्याकडे संदर्भासाठी आवश्यक असणारी पुस्तकं नव्हती. केवळ स्मरणशक्ती, विलक्षण आवाका, व्यापक आकलन आणि अफाट प्रतिभेच्या बळावर नेहरूंनी हे थक्क करणारे पुस्तक लिहिले. नेहरूंचे बरेचसे लेखन तुरुंगात झाले. ते सतरा वर्षे पंतप्रधान होते, हे आपल्याला ठाऊक असतेच. मात्र, स्वातंत्र्यलढ्यात अकरा वर्षे ते तुरुंगात होते. तुरुंगात जाताना ते गंमतीने म्हणायचे, ‘चला! आता नवं काही लिहून होईल!’
“काय नेहरू, नवं काय लिहिताय?”, असं कोणीतरी विचारल्यावर एकदा ते म्हणाले होते, “खूप दिवस तुरुंगात नाही गेलो. त्यामुळं वेळच नाही मिळाला.”
नेहरूंना ब्रिटिशांनी १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनानंतर अहमदनगर किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. त्यांच्यासोबत सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, गोविंद वल्लभ पंत आणि इतर नेते होते. हे सर्वजण १९४५ पर्यंत म्हणजे सुमारे तीन वर्षे अहमदनगर किल्ल्यात कैदेत होते.
तिथे नेहरूंनी हा ग्रंथ लिहिला. अहमदनगर किल्ल्यातील एका छोट्याशा खोलीत बसून तो लिहिला. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत आणि अन्यत्रही त्यांनी अहमदनगरविषयी खूप भावनिक उल्लेख केले आहेत.
नेहरू लिहितातः
“The old fort of Ahmednagar, ancient and massive, surrounded by deep moats and high walls, has become our residence and our world for some time to come.”
अहमदनगर हे, आपला जन्मदिन माहीत असलेले एकमेव ऐतिहासिक शहर. अहमदनगर शहराची स्थापना इ.स. १४९० मध्ये, २८ मे रोजी अहमद निजामशहा पहिला याने केली. त्या दिवशी त्याने याच भुईकोट किल्ल्याच्या परिसरात नवी राजधानी उभारली आणि तिचे नाव स्वतःच्या नावावरून ‘अहमदनगर’ असे ठेवले. बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर निजामशाही या स्वतंत्र सत्तेचा उदय झाला. निजामशाही काळात हे शहर शिक्षण, कला, संस्कृती, व्यापार आणि प्रशासन यांचे केंद्र बनले. अहमदनगरचा किल्ला या काळातल्या कैक घटनांचा साक्षीदार आहे.
अहमदनगर आणि औरंगाबादच्या इतिहासात मलिक अंबरचे स्थान खूप महत्त्वाचे. इथिओपियातला हा मुलगा. गुलाम म्हणून विकला जातो. भारतात येतो आणि सम्राट होतो! निजामशहा मुर्तजा दुसरा अल्पवयीन असताना, मलिक अंबरने राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला आणि निजामशाहीचे पुनरुज्जीवन केले. मुघलांच्या विशाल फौजांना धूळ चारली. डोंगर-दऱ्यांचा उपयोग करून शत्रूला फसवण्याचे, गनिमी काव्याचे तंत्र वापरले. मुघल सम्राट अकबर आणि त्याचा मुलगा जहांगीर या दोघांना त्याने अनेकदा पराभूत केले.
रयतवारीचा पाया अहमदनगरमध्येच रचला गेला. जमिनीची मोजणी करून प्रत्यक्ष उत्पादनावर आधारित करप्रणाली इथे सुरू झाली. शेतकर्याचा खूप बारकाईने विचार मलिक अंबर करत असे. जलसंधारण आणि सिंचनाच्या योजना इथे आखल्या गेल्या. मलिक अंबरने अनेक तलाव, बंधारे आणि कालवे बांधले. या काळात अहमदनगर आणि आसपासची शेती समृद्ध झाली. याच काळात अहमदनगर हे शिक्षण, संस्कृती, व्यापार आणि कारागिरीचे केंद्र बनले. धर्म, जात वा वंश असा भेद न करता, मलिक अंबरने प्रजेला समान वागणूक दिली. मलिक अंबर असेपर्यंत मुघलांना अहमदनगर कधीच जिंकता आले नाही.
तेव्हाच्या त्या पायावर आजचे अहिल्यानगर दिमाखात उभे आहे!
निजामशाही गेली. मग मुघल आले. औरंगजेबाचा अखेरचा काळ अहमदनगरमध्ये गेला. तो १७०७ मध्ये अहमदनगरजवळच गेला. त्यामुळे मुघल साम्राज्याच्या अखेरच्या श्वासांशीही अहमदनगर जोडले गेले.
मुघल सत्तेनंतर मराठ्यांनी अनेकदा अहमदनगरवर सत्ता मिळविण्याचे प्रयत्न केले. पेशवाईच्या काळात हे ठिकाण महत्त्वाचे ठाणे बनले. नंतर ब्रिटिशांनी मराठ्यांना पराभूत करून १८१७ मध्ये अहमदनगर आपल्या ताब्यात घेतले. या ब्रिटिश काळात किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून झाला. तिथे नेहरूंनी भारताचा शोध घेतला!
-संजय आवटे
❤147👍11🙏6🔥5
15 ऑक्टोबर हा दिवस जगभर “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणून साजरा केला जातो. तसेच भारताचे “मिसाईल मॅन” आणि “लोकप्रिय राष्ट्रपती” डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस.
कलाम साहेबांचे संपूर्ण आयुष्य हे विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी प्रवास होते.
गरीब घरातून सुरुवात करून, त्यांनी विज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मिती यांना समर्पित जीवन जगले. ते म्हणायचे 💬,
> “स्वप्न ते नसते जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ते असते जे आपल्याला झोपू देत नाही.”
त्यांच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थी हा भारताचा भविष्यदूत होता. त्यांच्या विचारांनी आजही विद्यार्थ्यांना मोठं स्वप्न पाहण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आहे.
💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
कलाम साहेबांचे संपूर्ण आयुष्य हे विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी प्रवास होते.
गरीब घरातून सुरुवात करून, त्यांनी विज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मिती यांना समर्पित जीवन जगले. ते म्हणायचे 💬,
> “स्वप्न ते नसते जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ते असते जे आपल्याला झोपू देत नाही.”
त्यांच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थी हा भारताचा भविष्यदूत होता. त्यांच्या विचारांनी आजही विद्यार्थ्यांना मोठं स्वप्न पाहण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आहे.
💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
❤100🥰5🙏4🎉2
सर्व ऑनलाइन बॅचेस वर दिवाळीनिमित्त मेगा बिग ऑफर 50%
कूपन कोड DIWALI
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
कूपन कोड DIWALI
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
❤20👍4🔥3
🪔 “दिवाळीची भेट — ज्ञानाचा उत्सव!”
💥 सर्व बॅचेसवर तब्बल 50% सूट!
📅 मर्यादित कालावधी: 17 ते 24 ऑक्टोबर
🎟️ कूपन कोड: DIWALI
📲 अँप डाउनलोड करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
💥 सर्व बॅचेसवर तब्बल 50% सूट!
📅 मर्यादित कालावधी: 17 ते 24 ऑक्टोबर
🎟️ कूपन कोड: DIWALI
📲 अँप डाउनलोड करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
❤21🥰2🔥1
MPSC Time table 2026.pdf
2.6 MB
MPSC Exam 2026 वेळापत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
● राज्यसेवा पूर्व 2026 - 31 मे 2026
● गट ब पूर्व परीक्षा 2026- 14 जून 2026
● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
● राज्यसेवा पूर्व 2026 - 31 मे 2026
● गट ब पूर्व परीक्षा 2026- 14 जून 2026
● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026
❤17
🔥 50% off..ऑफर चालू..
👉भूगोलाच्या सर्व ऑनलाईन बॅचेस वरती 50% सूट..
🔥ऑफर - 17 ते 23..
App Link
https://bit.ly/3uz8jHR
👉भूगोलाच्या सर्व ऑनलाईन बॅचेस वरती 50% सूट..
🔥ऑफर - 17 ते 23..
App Link
https://bit.ly/3uz8jHR
❤14🥰1
बाबा रामचंद्र
अवध किसान सभा
3000 शेतकऱ्यांना सोबत घेऊन चळवळ
●● अयोध्यातील शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी प्रसिद्ध असलेले बाबा रामचंद्र यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला असला तरी त्यांचे मूळ महाराष्ट्रातील होते
●● ते रामायनावर प्रभावी भाषण देत असत.
1920 पर्यंत ते साधूच्या वेशात भ्रमण करत असत.
●● सत्याग्रह कसा तर गळ्यात दोरखंड बांधून....
@history188
अवध किसान सभा
3000 शेतकऱ्यांना सोबत घेऊन चळवळ
●● अयोध्यातील शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी प्रसिद्ध असलेले बाबा रामचंद्र यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला असला तरी त्यांचे मूळ महाराष्ट्रातील होते
●● ते रामायनावर प्रभावी भाषण देत असत.
1920 पर्यंत ते साधूच्या वेशात भ्रमण करत असत.
●● सत्याग्रह कसा तर गळ्यात दोरखंड बांधून....
@history188
❤40👍7
इशारा - महात्मा फुले
इशारा ही पुस्तक महात्मा फुले यांनी न्या. रानडे यांच्या, "तीस वर्षांपेक्षा हल्ली शेतकऱ्यांची स्थिती चांगली आहे" या मताचे खंडन या पुस्तकात केले होते
आयोगाचा प्रश्न आलेला आहे
@history188
इशारा ही पुस्तक महात्मा फुले यांनी न्या. रानडे यांच्या, "तीस वर्षांपेक्षा हल्ली शेतकऱ्यांची स्थिती चांगली आहे" या मताचे खंडन या पुस्तकात केले होते
आयोगाचा प्रश्न आलेला आहे
@history188
❤76👍20🔥4
सरदार पटेल यांची 150 वी जयंती
त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातच्या नडियाद येथे झाला होता.
✍ राष्ट्रीय एकता दिवस :-
हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणूनही
ओळखला जातो, कारण त्यांनी देशाला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
@history188
त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातच्या नडियाद येथे झाला होता.
✍ राष्ट्रीय एकता दिवस :-
हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणूनही
ओळखला जातो, कारण त्यांनी देशाला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
@history188
❤44🙏4