परवा एका मैत्रिणीसोबत बुधवार पेठेत गेलतो. आता काही जाणकार लोक्स म्हणतील की मैत्रीण असताना बुधवार पेठेत जाण्याची काय गरज? किंवा बुधवार पेठेत जाताना मैत्रिणीला घेऊन जायची काय गरज and Vice Versa वगैरे. तर तुम्ही हा विषय दुसरीकडेच नेत आहात. बुधवार पेठेत एक मराठी पाणीपुरीवाला आहे तिथली मसाला पुरी मला आवडते म्हणून मी जात असतो कधी-मधी तिकडे.

तेव्हा तिथे पाणीपुरी खात असताना एक साधारण पाच ते सहा वर्षांची लहान मुलगी आली आणि पैसे मागायला लागली. रस्त्यावर पैसे मागणाऱ्यांना लोकांकडून पैसे काढायच्या ट्रिक्स माहित असतात. एखादं कपल असलं की ते बरोबर पोराला पैसे मागतात. त्यांना माहीत असतं की पोरगा, पोरीसमोर शायनिंग मारायला आपल्याला पैसे देईलच आणि देतात पण बहुतेक लोक पण मी नाही देत पोरीला काय वाटायचे ते वाटु दे. इमेज बिल्डिंगसाठी केलेली कोणतीही गोष्ट तदन फालतूपणा आहे पोरीसमोरील इमेज तुम्ही उपसलेल्या कष्टाने बिल्ड झाली पाहीजे, अशी माझी श्रद्धा आहे. मी पैसे दिले नाही म्हणून ती लहान मुलगी पाणीपुरीवाल्याकडे पैसे मागायला गेली पण पाणीपुरीवाला तिला म्हणाला की, "ये बर्तन धोले, फिर मै तुझे 20 रुपये दूंगा! अर्थात भांडी धुवायची ऑफर नाकारली त्या पोरीने आणि ती निघून गेली.

नंतर तो पाणीपुरीवाला त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या विसेक वर्षांच्या पोराकडे हात करत म्हणाला की, या पोराने तिला भिक मागायला आणलंय आणि असे अजून पाच लहान पोरं भीक मागायला घेऊन आलाय तो इकडे, ते ऐकून मी चाट पडायच्या ऐवजी चाट उभा राहीलो.

तुम्हाला पुण्यातल्या बहुतेक प्रसिद्ध रस्त्यांना, सिग्नल्सला, चौकात, पर्यटनस्थळी उत्तरभारतातून आलेली लहान मुलं भीक मागताना दिसतील. पुण्यात एफसी रोड, जेएमम रोड, झेड ब्रिज (या पुलाखाली त्यांची वस्ती सुद्धा आहे) एमजी रोड व इतर अनेक ठिकाणी ही लहान मुलं दिसतात. यातले काही कॅरीबॅग विकताना, टिशू पेपर व पेन वगैरे विकताना दिसतात आणि आपण जर त्यांच्याकडील वस्तू घेतली नाही तर ते लगेच पैसे मागायला लागतात. असली भिक मागणारी लहान मुलं मी दिल्लीतही मोठ्या प्रमाणात पाहिली आहे. यमुनेकिनारी ते राहायचे आणि मेट्रोने प्रवास करून दिल्लीतल्या वेगवेगळ्या ठिकाणी भिक मागायला जायचे. दिल्लीत फॉरेनर टुरिस्ट मोठ्या प्रमाणात येतात त्यांच्यामागे तरी ही मुलं हात न धुता लागतात आणि पैसे मिळाल्याशिवाय पिच्छाच सोडत नाही, फॉरेनर टुरिस्टला पार इरिटेट करून टाकतात.

महाराष्ट्र हे भारतातील सगळ्यात जास्त उद्योगधंदे असलेलं राज्य आहे आणि इथे बाहेरून आलेल्या लेबर लोकांची गरज आहेच कारण कष्टाची कामे करायला मराठी मानुस तयार नाही. इंडस्ट्रियल ब्लू काॅलर जॉबमधील मराठी माणसाची संख्या अत्यंत नगण्य झाली आहे. पण या परराज्यातून येणाऱ्या कामगारांसोबत येणाऱ्या भिकाऱ्यांचं काय? यात फक्त लहान मुलं नाही तर म्हातारी माणसं, प्रौढ लोकं सुद्धा असतात आणि ही लोकं भिकेतून जास्त पैसे मिळवण्यासाठी कित्येक मुलं जन्माला घालतात. नुकत्याच बाळाला जन्म दिलेल्या स्त्रियाही तुम्हाला भीक मागताना दिसतील. त्या बाईकडे असलेलं लहान मुल पाहून लोक त्यांना पैसे देतात आणि अशा लोकांना दोन-तीन रुपये दिले तर चालत नाही उलट ते तुमच्याकडे तुच्छतेने कटाक्ष टाकून निघून जातात, दहा रुपये घेतल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही.

मुद्दा आहे की सरकार यावर नियंत्रण का ठेवत नाहीये? राज ठाकरे परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांबाबत बोलून बोलून थकले पण त्यावर काहीही रेगुलेशन्स आलेले नाहीत आणि जे कायदे व रेगुलेशन्स आधीच असतील अस्तित्वात आहे त्यांची अंमलबजावणी प्रशासन करत नाही. त्यातून जे सामाजिक राजकीय व आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार? भिक मागण्यासाठी मुलं जन्माला घालणे हे सरळ सरळ लहान मुलांचं शोषण आहे आणि कुठल्याही पक्षाचा सरकार असो ही समस्या तशीच आहे. देशात कुठेही व्यवसायासाठी शिक्षणासाठी व काम करण्यासाठी जाण्यात काहीही अडचण नाही पण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात भीक मागण्यासाठी येणारे लोंढे थांबलेच पाहिजे. ज्या राज्यातून हे येत आहेत त्या राज्यांनी याची काळजी घेतली नाही तर ज्या राज्यात ही लोकं जातात त्यांनी त्यावर बंधने लादलीच पाहिजे.
-Vijay Rahane #vijubaba
परवा एका मैत्रिणीसोबत बुधवार पेठेत गेलतो. आता काही जाणकार लोक्स म्हणतील की मैत्रीण असताना बुधवार पेठेत जाण्याची काय गरज? किंवा बुधवार पेठेत जाताना मैत्रिणीला घेऊन जायची काय गरज and Vice Versa वगैरे. तर तुम्ही हा विषय दुसरीकडेच नेत आहात. बुधवार पेठेत एक मराठी पाणीपुरीवाला आहे तिथली मसाला पुरी मला आवडते म्हणून मी जात असतो कधी-मधी तिकडे.

तेव्हा तिथे पाणीपुरी खात असताना एक साधारण पाच ते सहा वर्षांची लहान मुलगी आली आणि पैसे मागायला लागली. रस्त्यावर पैसे मागणाऱ्यांना लोकांकडून पैसे काढायच्या ट्रिक्स माहित असतात. एखादं कपल असलं की ते बरोबर पोराला पैसे मागतात. त्यांना माहीत असतं की पोरगा, पोरीसमोर शायनिंग मारायला आपल्याला पैसे देईलच आणि देतात पण बहुतेक लोक पण मी नाही देत पोरीला काय वाटायचे ते वाटु दे. इमेज बिल्डिंगसाठी केलेली कोणतीही गोष्ट तदन फालतूपणा आहे पोरीसमोरील इमेज तुम्ही उपसलेल्या कष्टाने बिल्ड झाली पाहीजे, अशी माझी श्रद्धा आहे. मी पैसे दिले नाही म्हणून ती लहान मुलगी पाणीपुरीवाल्याकडे पैसे मागायला गेली पण पाणीपुरीवाला तिला म्हणाला की, "ये बर्तन धोले, फिर मै तुझे 20 रुपये दूंगा! अर्थात भांडी धुवायची ऑफर नाकारली त्या पोरीने आणि ती निघून गेली.

नंतर तो पाणीपुरीवाला त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या विसेक वर्षांच्या पोराकडे हात करत म्हणाला की, या पोराने तिला भिक मागायला आणलंय आणि असे अजून पाच लहान पोरं भीक मागायला घेऊन आलाय तो इकडे, ते ऐकून मी चाट पडायच्या ऐवजी चाट उभा राहीलो.

तुम्हाला पुण्यातल्या बहुतेक प्रसिद्ध रस्त्यांना, सिग्नल्सला, चौकात, पर्यटनस्थळी उत्तरभारतातून आलेली लहान मुलं भीक मागताना दिसतील. पुण्यात एफसी रोड, जेएमम रोड, झेड ब्रिज (या पुलाखाली त्यांची वस्ती सुद्धा आहे) एमजी रोड व इतर अनेक ठिकाणी ही लहान मुलं दिसतात. यातले काही कॅरीबॅग विकताना, टिशू पेपर व पेन वगैरे विकताना दिसतात आणि आपण जर त्यांच्याकडील वस्तू घेतली नाही तर ते लगेच पैसे मागायला लागतात. असली भिक मागणारी लहान मुलं मी दिल्लीतही मोठ्या प्रमाणात पाहिली आहे. यमुनेकिनारी ते राहायचे आणि मेट्रोने प्रवास करून दिल्लीतल्या वेगवेगळ्या ठिकाणी भिक मागायला जायचे. दिल्लीत फॉरेनर टुरिस्ट मोठ्या प्रमाणात येतात त्यांच्यामागे तरी ही मुलं हात न धुता लागतात आणि पैसे मिळाल्याशिवाय पिच्छाच सोडत नाही, फॉरेनर टुरिस्टला पार इरिटेट करून टाकतात.

महाराष्ट्र हे भारतातील सगळ्यात जास्त उद्योगधंदे असलेलं राज्य आहे आणि इथे बाहेरून आलेल्या लेबर लोकांची गरज आहेच कारण कष्टाची कामे करायला मराठी मानुस तयार नाही. इंडस्ट्रियल ब्लू काॅलर जॉबमधील मराठी माणसाची संख्या अत्यंत नगण्य झाली आहे. पण या परराज्यातून येणाऱ्या कामगारांसोबत येणाऱ्या भिकाऱ्यांचं काय? यात फक्त लहान मुलं नाही तर म्हातारी माणसं, प्रौढ लोकं सुद्धा असतात आणि ही लोकं भिकेतून जास्त पैसे मिळवण्यासाठी कित्येक मुलं जन्माला घालतात. नुकत्याच बाळाला जन्म दिलेल्या स्त्रियाही तुम्हाला भीक मागताना दिसतील. त्या बाईकडे असलेलं लहान मुल पाहून लोक त्यांना पैसे देतात आणि अशा लोकांना दोन-तीन रुपये दिले तर चालत नाही उलट ते तुमच्याकडे तुच्छतेने कटाक्ष टाकून निघून जातात, दहा रुपये घेतल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही.

मुद्दा आहे की सरकार यावर नियंत्रण का ठेवत नाहीये? राज ठाकरे परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांबाबत बोलून बोलून थकले पण त्यावर काहीही रेगुलेशन्स आलेले नाहीत आणि जे कायदे व रेगुलेशन्स आधीच असतील अस्तित्वात आहे त्यांची अंमलबजावणी प्रशासन करत नाही. त्यातून जे सामाजिक राजकीय व आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार? भिक मागण्यासाठी मुलं जन्माला घालणे हे सरळ सरळ लहान मुलांचं शोषण आहे आणि कुठल्याही पक्षाचा सरकार असो ही समस्या तशीच आहे. देशात कुठेही व्यवसायासाठी शिक्षणासाठी व काम करण्यासाठी जाण्यात काहीही अडचण नाही पण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात भीक मागण्यासाठी येणारे लोंढे थांबलेच पाहिजे. ज्या राज्यातून हे येत आहेत त्या राज्यांनी याची काळजी घेतली नाही तर ज्या राज्यात ही लोकं जातात त्यांनी त्यावर बंधने लादलीच पाहिजे.
-Vijay Rahane #vijubaba
गेल्या दशकभरात हॉटेलमध्ये पाण्याच्या ग्लासाची जागा बाटलीबंद विकतच्या पाण्याने घेतली.

मी एक व्यवसायिक असल्यामुळे मला व्यवसायिकाचे डोके कसे चालते याचा बऱ्यापैकी अंदाज आहे, व्यवसायिक प्रत्येक गोष्टीतून पैसा कसा काढता येईल, याचाच अंदाज लावत असतो.

पैसा कमावणे वाईट नाही, नीतीने पैसे कमावणे म्हणजे आजच्या काळात पुण्यकर्मच जणू.

मात्र ग्राहकांनी बाटलीबंद पाणी झक मारून विकत घ्यावे, यासाठी कॅफेवाले, हॉटेल व्यवसायिक तिथे स्वच्छ पाणी ठेवतच नाहीत.

एक उडुपी हॉटेलवालेच आहेत, ज्यांचे वेटर ग्राहकाला पाण्याने भरलेले ग्लास टेबलवर आणून देतात. चहाच्या हॉटेलात एक घाणेरडा पाण्याने भरलेला मग ठेवलेला असतो, ज्याला पाणी प्यायचे असेल तो ते पीईल. किंवा एक जग ठेवलेला असतो, ज्याच्या तळाला मातीचे कण असतात, जे स्पष्ट दिसतात. त्यामुळे कोणी ते पाणी पित नाही, नाईलाजाने विकतचे बाटलीतले पाणी घ्यावे लागते. काही कॅफेवाले तर असे अस्वच्छ पाणीसुध्दा ठेवत नाही, पाणी विकतच घ्यावे लागते. जितके पैसे चहाला खर्चायचे तितकेच प्यायच्या पाण्यालासुध्दा खर्च करावे लागतात.

पाणपोया जवळजवळ बंदच झाल्या आहेत, त्यातले पाणी कुणी पित नाही, त्यामुळे त्यांचा उपयोग तोंड धुण्यासाठी होतो. कालांतराने त्याचा maintenance न पाहिल्याने त्या नादुरुस्त अवस्थेत जातात.

हल्ली स्वच्छ पाणी मिळतच नाही, Aquaguard तरी लागतो, नाहीतर बाटलीबंद पाणी. अन्यथा घरातील नळाला येणारे पाणी हंड्यात साठवून ठेवले की ते निवळल्यावर तळाला मातीचे कण साचलेले स्पष्ट दिसतात.

बाटलीबंद पाणी विकणारा शेवटचा Retailer ते विकून तीनपट नफा कमावत असतो, जो प्रचंड आहे. म्हणजे वीस रुपयाची बाटली त्याला अवघ्या सहा-सात रुपयात मिळत असते. मग हॉटेलवाला कशाला म्हणून ग्राहकाला फुकटात स्वच्छ पाणी देईल.

स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे हा तसा माणसाचा, ग्राहकाचा मूलभूत अधिकार आहे. पण आपल्याकडे अधिकाराची ऐशी की तैशीच असते.

- निलेश अभंग, कल्याण

#randomthoughts
कॅडबरी कंपनी चॉकलेट विकत नाही - आनंद, उत्सव विकते.

फरारी कंपनी कार विकत नाही - स्पीड, थ्रिल विकते.

रोलेक्स कंपनी घड्याळ विकत नाही - आत्मसन्मान, स्वाभिमान विकते.

या सगळ्या वरकरणी इमोशन्स - भावना - आहेत. पण त्या भावना आपल्याला जाणवण्यासाठी या सर्व ब्रॅंड्सने स्वतः भोवती अत्यंत परिणामकारक गोष्टी गुंफल्या आहेत.

सगळे यशस्वी बिझनेसेस झकास स्टोरी टेलिंगमुळे मोठे झालेले दिसतात.

गोष्टी सांगता यायला पाहिजे. बिझनेसमध्ये तर यायलाच पाहिजे. गोष्ट जितकी जास्त परिणामकारक - तितका अधिक समोरच्यावर प्रभाव - तेवढा अधिक विश्वास - तेवढं पक्कं नातं - तेवढा "सेल" अधिक.

पण या गोष्टी फक्त छान छान शब्दांनी तयार होत नाहीत. केवळ सुंदर स्क्रिप्ट जमून आली म्हणून विश्वास जिंकता आला असता तर कंपन्यांनी भरघोस पगार देऊन स्क्रिप्ट रायटर्स ठेवले असते दिमतीत.

या गोष्टींमधे मूल्य निर्मितीचा गाभा असावा लागतो.

सँट्रो घेण्याची ऐपत / इच्छा असणाऱ्याला फरारीची गोष्ट सांगून उपयोग नाही.

फरारीची ऐपत / इच्छा असणाऱ्याला कितीही पटवलं तरी - सँट्रो कधीच घ्यावी वाटणार नाही.

सॅंट्रोची गोष्ट वेगळी, फरारीची वेगळी.

म्हणजेच एखाद्या गोष्टीचं मूल्य केवळ त्या गोष्टीवर अवलंबून नसतं - ती गोष्ट "कोण" विकत घेणार आहे यावर ठरत.

गोष्ट लाकूडतोड्याची असो वा ससा कासवाची - मोठ्याना समजतेच की! पण नेहेमी लहानांनाच सांगितली जाते! टार्गेट ऑडियन्स बदलला की गोष्टी बदलत जातात.

म्हणजेच - "कुणाला" सांगायची आहे हे ओळखता यायला पाहिजे - त्यानुसार गोष्ट गुंफता यायला पाहिजे - आणि मग - योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे "सांगता" यायला पाहिजे.

ज्यांना हे जमत नाही त्यांना समोरच्याला पटवत बसावं लागतं, मागे लागावं लागतं, घासाघीस करून - रक्त आटवून - प्रॉफिट कमी करून मग कसंबसं विकावं लागतं!

ज्यांना हे जमतं - ते मात्र - आपला तगडा ब्रँड तयार करतात. नव्या लोकांना आकर्षित करतात. जुन्यांना कायमचं आपलंसं करून ठेवतात.

तुमचा नेहेमीचा टेलर असो वा कॅडबरी - या सगळ्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केलाय म्हणून ते तुमच्या लक्षात आहेत.

त्यांना परिणामकारक स्टोरी क्राफ्ट करून तुमच्यावर बिंबवता आली आहे - म्हणून तुम्ही त्यांना बांधले गेला आहात.

रोजच्या ऑपरेशनमध्ये अडकलेल्या बिझनेस ओनर्सनी जर असा ब्रँड तयार करण्याकडे लक्ष दिलं नाही तर कितीही मेहनत घेतली तरी ग्रोथ अशक्य आहे.

पर्सनल ब्रँड म्हणून महत्वाचा आहे.

आजच्या सर्वत्र गोंगाट असणाऱ्या जगात तर फारच!

चिअर्स!

ओंकार दाभाडकर
[email protected]
व्यावसायिकाने कॉलेज सॅक / बॅग पाठीवर लटकवून कधीच फिरू नये... तुम्ही कितीही चांगला वेष परिधान केलेला असो, कितीही टाईट फिट असो पण तुमच्या पाठीवर कॉलेज सॅक दिसली कि तुमचे व्यावसायिक इम्प्रेशन पूर्णपणे संपून जाते.

व्यवसायात आपली सोय कधीच बघायची नसते. हाताळायला सोपे, कागदपत्रे ठेवायला सोपे, गाडी चालवताना त्रास होत नाही म्हणून बरेच व्यावसायिक सॅक वापरायला प्राधान्य देतात पण यामुळे ग्राहकाच्या नजरेत आपले इम्प्रेशन खराब होत आहे हे लक्षात घेतले जात नाही. एक तर ती सॅक व्यावसायिकांसाठी नसतेच, दुसरे म्हणजे ती वापरून वापरून प्रचंड खराब झालेली असते, मळकी आणि जुनी झालेली असते, हेही फार खराब दिसतं...

पाठीवर लटकावयाची सॅक हि खरं तर फक्त कॉलेजसाठीच असायची पण हाताळायला सोपी म्हणून नोकरदार लोकांकडून तिचा वापर मोठ्या प्रमाण व्हायला लागला, आता तर ती नोकरदारांसाठी गरज झाली आहे, आणि त्यांना ती योग्य सुद्धा दिसते, पण व्यावसायिकांसाठी बिलकुल नाही. अशा पद्धतीने सॅक वापरणाऱ्या बहुतांशी व्यवसायीकांना ग्राहकाकडून एका मर्यादेपलीकडे महत्व दिले जात नसल्याचे दिसून येईल. ग्राहक प्रत्येक गोष्टीला एका ठराविक दृष्टिकोनातून बघत असतो. कर्मचाऱ्यासारखी व्यावसायिकाची वेशभूषा असेल तर व्यावसायिक सुद्धा कर्मचाऱ्यांप्रमाणे वाटायला लागतो, आणि त्याला मिळणारा प्रतिसाद सुद्धा तसाच असतो.

व्यवसायामध्ये आपली सोय कधीच बघायची नसते, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून योग्य वाटणाऱ्या गोष्टी महत्वाच्या असतात. व्यावसायिकांनी शक्यतो एकच पट्टा असलेली हँडबॅग वापरावी जी एका खांद्यावर तिरप्या पद्धतीने लटकवली जाते, किंवा तिला लहान पट्टा असतो ज्यामुळे ती एका हातामध्ये सहज धरता येते. हा professional look वाटतो. आसपास थोडे निरीक्षण करून बघा, पाठीवर लटकवलेली सॅक आणि एक पट्टा असलेली तिरप्या पद्धतीने लटकवलेली हँडबॅग या दोन्ही look मध्ये किती फरक आहे लक्षात येईल... अगदी, एवढ्या लहानश्या बदलामुळे देहबोली (body language) मध्ये सुद्धा खूप फरक पडत असल्याचे लक्षात येईल.

व्यवसाय साक्षर व्हा...

© श्रीकांत आव्हाड
💲🔴💲"सर लोकांकडे एवढा पैसा येतो कुठून ??" 💲🔴💲

नवीन उद्योजक मित्रासोबतच्या मिटिंग मध्ये काल घडलेला किस्सा ..

प्रश्न खरंच महत्वाचा वाटला म्हणून खास त्याच्यातील आणि माझ्यातील संवाद तुमच्यासाठी लिहीत आहे ..

नक्की पूर्ण वाचा .

सर लोकांकडे एवढा पैसा येतो कुठून ?? 🤔🤭

प्रश्न तसा अवघड आणि तसाच सोपाही .

📌 लोक श्रीमंत होतात त्यामागे पहिल कारण असत त्यांनी "आऊट ऑफ द वे " म्हणजेच प्रवाहापेक्षा वेगळा केलेला विचार .

जास्त करून हि लोक "ध्येयवेड्या " प्रकारात मोडतात . ते कधीही पैसाच कमवायचा या उद्देशाने काम करत नसतात. पण त्यांनी निवडलेला मार्ग त्यांना दिलेल्या सेवेच्या बदल्यात बक्कळ पैसे कमावून देतो .

बरं यांचा प्रमुख उद्देश श्रीमंत बनून फिरण्याचा नसतोच बरं का . ते फक्त स्वतः ची आवड , ध्येय या गोष्टींना सांभाळतात आणि शेवटी मोठी होतात .

हा प्रवासही काही एक दिवसाचा नसतो .

तो प्रचंड चढ उतार , यश अपयश आणि अफाट कष्टानी भरलेला असतो . पण शेवटी तुमच्या आमच्यासारख्या लोकांना दिसतो तो फक्त पैसा ..

आता याच उदाहरण दिल कि तुम्हाला अगदी चित्र स्पष्ट दिसेल .

तुमच्या आसपास अथवा कुटुंबात कुणी डॉक्टर , इंजिनियर , चार्टरड अकाउंटंट , यशस्वी सुधारित शेतकरी अथवा कारखानदार नक्कीच असेल ती सर्व लोक या विभागात मोडतात .

तुम्ही काम करत असलेली कंपनी , ऑफिस अथवा व्यवसाय हे अशाच ध्येयवेड्या माणसाचं काम असत जे पुढं जाऊन अफाट रूप घेत .

काम जसा जसा वाढत तसा तसा श्रीमंतीचा लेख हि वाढत जातो .

📌 आता श्रीमंतीच्या दुसऱ्या प्रकारात मोडणारी मंडळी हि पहिल्या प्रकारापेक्षा अतिशय उलट विचार सरणीची असतात .

एकाचे दोन करण्यासाठी ह्यांच्याकडे अफाट मार्ग आणि इच्छा शक्ती असते .

"बर स्ट्रगल , कष्ट इथेही कॉमन आहेतच आ"..

फक्त इथे लोक "रिस्क " घेण्यावर जास्त विश्वास ठेवतात .

एक उत्पन्नाचा मार्ग हा फक्त आपल्या अन्न , वस्त्र व निवारा पूर्ण करण्यासाठी बनलेला असतो असा यांचा पूर्ण विश्वास असतो त्यामुळे एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे मार्ग शोधण्यात हि मंडळी तरबेज असतात .

वेळेचं योग्य नियोजन , लोकांना जोडण्याची क्षमता, पैसे कमावण्याची ओढ याना जबरदस्त ऊर्जा देते .

यात प्रामुख्याने येतात मार्केटिंग प्रोफेशनल , कंसल्टंट्स , इस्टेट ब्रोकर्स आणि शेअर मार्केट ट्रेडर्स ..

"रिस्क है तो इश्क है " म्हणत हि लोक प्रचंड पैसे कमावतात आणि मोठे होतात .

आता यात सगळेच यशस्वी होतात का ?? तर नाही .

पण सगळेच अयशस्वी हि होत नाही . तुमची जशी भूक तेवढे पैसे तुम्ही कमावता .

हि लोक नव्या गोष्टी शिकताना घाबरत नाहीत . संधीच सोन करणं आणि प्रचंड आशावादी राहून यांचा प्रमुख गुण म्हणावा लागेल .

या प्रकारात येणारी मंडळी नोकरी सोबत अथवा एक व्यवसायासोबत अजून जोडव्यवसाय करण्यावर भर देते आणि पैसे कमावते .

📌 शेवटी येते पिढीजात श्रीमंत लोक ..

पिढ्यानपिढ्या पैसे कमावण्याची पद्धत सेट असल्यामुळे यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाते .

हि लोक गुंतवणुकीवर जास्त भर देतात . त्यांना पैसे कमवण्याची आलेली कसलीही संधी ते सोडत नाहीत ..

बरं पैशाने पैसे वाढतात हे समीकरण यांना पूर्ण लागू होत .

यात पुन्हा मोठे कारखानदार , बँकर्स , यशस्वी व्यवसायिक यांचा प्रामुख्याने समावेश होतो .

म्हणून लक्षात घ्या , श्रीमंती हि तुमची आमची पैशाची भूक आहे जी सगळ्यांसाठी वेगळी असू शकते .

पण ती भूक असंण अत्यंत घरजेच आहे .

खर्च आणि कमाई एकसारखी असेल तर श्रीमंती कधीही तुमच्या घराचं ठोठावणार नाही .

म्हणून आऊट ऑफ बॉक्स विचार करायला घाबरू नका .

एकापेक्षा जास्त उत्पन्नाची साधन ठेवा.

रिस्क घ्या .

तुम्हाला वाटत असेल तुमची आवड एक दिवस मला पैसे कमावून देईल तर तिला फोल्लो करा कारण जे भविष्य तुम्हाला दिसेल तेच सर्वाना दिसणार नाही .

यशस्वी व्हा . श्रीमंत व्हा .

धन्यवाद

लेखन श्री मनोज इंगळे
संस्थापक - उद्योगमंत्र मराठी

Like | Share | Subscribe to उद्योगमंत्र मराठी

#udyogmantra #उद्योगमंत्र #मराठी #उद्योजक #udyogmantramarathi #motivation #bloggersofinstagram #blogger #FacebookPage #udyogmantramarathi
एक नवउद्योजक... तरुण वय... त्याच्या एका कस्टमरकडे त्याची भली २०-२५ लाख रुपये उधारी थकलेली. वर्षभर झाले तरी उधारी देईना, कॉल ला प्रतिसाद देईना...

शेवटी या नवउद्योजकाने आपल्याकडे काम करणाऱ्या पाचसहा जणांना घेऊन त्या ग्राहकाचे ऑफिस गाठले, सोबत लोखंडी रॉड घेऊन गेले. तिथे समोरासमोर थोडे वादविवाद झाले. याने लगेच आपल्या माणसांच्या सोबतीने त्या ऑफिसमधल्या सगळ्यांना रॉड, पाईपने मारहाण करायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये कामासाठी मुली सुद्धा होत्या. सगळाच गोंधळ.

त्या ग्राहकाने पोलिसांना बोलावले. याच्यावर आणि याच्या कार्यकर्त्यांवर खंडणी, दरोडा, विनयभंग असे बरेच गुन्हे दखल झाले. हे पाच सहा जण थेट जेलमधे... नवउद्योजकाचा व्यवसायाचा मोबाईल सुद्धा जप्त झाला... वर्षभर आतमध्ये... मोबाईल जप्त असल्यामुळे संपर्क ठप्प, इकडे व्यवसाय सांभाळायला कुणी नाही. घरातल्यांनी व्यवसाय हाताळण्याचा प्रयत्न करून पहिला, पण त्यांना जास्त काही जमले नाही. थोडेफार जमले तरी कामाचा मोबाईल, गाडी जप्त असल्यामुळे आणि हा स्वतःच आत असल्यामुळे ७०-८०% व्यवहार ठप्प झाले.

वर्षभरानंतर बाहेर आल्यावर आता व्यवसाय तसाही संपल्यात जमा आहे. उधारी तशीच गेली, ती आता वसुलीच्या बाहेर गेली आहे... नवउद्योजक आता म्हणतोय, भाऊ व्यवसायात संयम पाहिजे...

१. उधारी वसुलीचे कौश्य असेल तरच उधारी करावी. मार्केटमध्ये ८०% व्यवहार उधारीचेच आहेत, त्यामुळे त्याला आपण टाळू शकत नाही. पण उधारी करताना समोरच्या ग्राहकाची मार्केट मधील प्रतिमा सुद्धा तपासून घेणे आवश्यक असते. यासोबतच चांगले संबंध ठेवणे, पाठपुरवठा करणे अशा गोष्टींची आवश्यकता असते.
२. उधारी वसूल होत नसल्यास कायदेशीर कारवाईचा पर्याय असतो. (उधारी संबंधी उद्योजक मित्र च्या वेबसाईटवर एक दोन लेख आहेत)
३. मोठ्या उधारीवेळी चेक घेऊ ठेवता आल्यास उत्तम
४. उधारी वसुलीचे सर्व व्यावसायिक मार्ग संपल्यानांतर सुद्धा समोरचा प्रतिसाद देत नसेल तर त्याचा उद्देश उधारी फेडण्याचा नाही हे लक्षात येते
४. एकदा समोरच्याचा उधारी फेडण्याचा उद्देश नाही असे लक्षात आल्यावर मग चांगला वकील गाठावा, व फौजदारी आणि दिवाणी कारवाईला सुरुवात करावी.
५. उगाच काठ्या घेऊन हाणामारीला सुरुवात करू नये. आपण व्यावसायिक आहोत, गुंड नाही. कॉलेजमधे गुंडगिरी केली, मारामाऱ्या केल्यात म्हणून पुढेही तोच प्रकार चालून जातो या भ्रमातून बाहेर या. कॉलेज जीवन आणि कॉलेजनंतरचे जीवन यात फरक असतो.
६. कोणतेही व्यवहार करताना लिखापढी ठेवावी. पर्चेस ऑर्डर, बिल, डिलिव्हरी चलन जपून ठेवावेत. बिल ईमेल वर सुद्धा पाठवावे. डिलिव्हरीचे कन्फर्मेशन घ्यावे. उधारीचे पाठपुरवठा तसेच इतर जी काही चर्चा करायची असेल ती ईमेल वर किंवा WhatsApp वर करावी. शक्यतो ईमेल ला प्राधान्य द्यावे.
७. या चर्चेवेळी आपल्याला गरज पडल्यास पुढे कायदेशीर कारवाईत कामी येतील अशा शब्दांचा विचारपूर्वक प्रयोग करावा.
८. सुरुवातीला गोडगोड बोलूनच उधारी वसुलीला प्राधान्य द्यावे. न जमल्यास विनंती करून चेक घेण्याचा प्रयत्न करावा, भलेही तो दूरच्या तारखेचा असेल. आणि हेही जमले नाही तर पुढील कायदेशीर कारवाईचा विचार करावा...
९. व्यवसायात संयमाला पर्याय नाही. इथे चुकीला माफी मिळत नाही. एक चुक सुद्धा व्यवसायाला संपवू शकते. त्यामुळे संयम महत्त्वाचाच आहे.
१०. आपल्याला सगळं कळतं हा विचार कधीच करू नका. योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची मदत नेहमी घ्यावी.

व्यवसाय साक्षर व्हा...

© श्रीकांत आव्हाड

===========
https://www.tg-me.com/+bUyOR79tPHw1N2Y1

मराठी वाचक आणि साहित्य

#पुस्तके #साहित्य #वाचन
बुके बनवून विकण्याचा बिजनेस करणे, हा अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये करण्याचा बिजनेस आहे. याला फार खर्च लागत नाही.

एखाद्या Sweet shop (मिठाईचे दुकान), Cake Shop च्या आवारात, व्हरांड्यात हा बिजनेस करण्यासाठी तुम्ही जागा मिळवू शकता. त्याचे थोडेफार भाडे दिले की तो दुकानदार तुम्हाला एक टेबल आणि पुष्पगुच्छ बनवण्यासाठी आवश्यक असलेले material ठेवण्यासाठी जागा देऊ शकतात.

लोक आनंदाच्या क्षणी, वाढदिवसाच्या दिवशी, कुणाची भेट घेण्याकरता बुके विकत घेतात. त्यामुळे cake shop, Sweet shop मध्ये येणारे ग्राहक बुके घेण्यासाठी तुमच्याकडे वळू शकतात.

शिवाय गल्लीगल्लीत झालेले युवानेते, भाऊ, दादा, शेठ त्यांच्या आवडत्या नेत्यांना बुके देतच खुश करण्याचा प्रयत्न करत असतात.

बुके कसे बनवायचे , याचे लाखो व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही मोफत प्रशिक्षण घेऊ शकता.

हा बिजनेस अत्यंत चालणारा आहे. शिवाय सध्या लोकांना लहान मोठ्या प्रसंगाचा इव्हेंट करण्याची सवय लागली आहे. त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याची लोकांना घाई असते, त्यामुळे सध्याचा काळ बुके विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी अत्यंत पूरक आहे.

करून तर पाहा.
धक्कादायक! AnyDesk हॅक झाला, युजर्सनी लगेच पासवर्ड बदलावे.
#AnyDeskHacked

मित्रानो, सध्या वापरली जाणारी लोकप्रिय रिमोट डेस्कटॉप ऍप्लिकेशन AnyDesk ची ही सिस्टम हॅक झाल्याचा धक्कादायक वृत्ता समोर आली आहे.

*काय झालं?*

AnyDesk Software GmbH ने शुक्रवारी संध्याकाळी हे कबूल केलं की त्यांच्या प्रोडक्शन सिस्टमवर सायबर हल्ला झाला आहे.

या हल्ल्यामुळे कंपनीची डेटाबेस किंवा इतर संवेदनशील माहिती चोरी झाली का हे अद्याप स्पष्ट नाही.
या हल्ल्याशी संबंधित तपशील कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही.

*युजर्स काय करायचं?*

AnyDesk ने युजर्सना तातडीने त्यांचे पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे.
29 जानेवारी 2024 रोजी रिलीज झालेलं AnyDesk व्हर्जन 8.0.8 वापरत असाल तर ते अपडेट करा कारण हे नवीन व्हर्जन नवीन सिक्युरिटी सर्टिफिकेटसह येतं.
दुसऱ्या एंटी-व्हायरस सॉफ्टवेअरने तुमचा सिस्टम स्कॅन करा.

*काळजी घ्या!*

जुन्या पासवर्ड पुन्हा वापरू नका आणि मजबूत, युनिक पासवर्ड वापरा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा.
फिशिंग ईमेल आणि संशयास्पद लिंक टाळा.

#cybersecurity #dataprotection #staysafeonline
2024/05/10 07:24:04
Back to Top
HTML Embed Code: